मनगोळी गावचे सरपंच अभिमान घंटे यांची प्रहार संघटनेच्या द.सोलापूर तालुका संपर्क प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल सत्कार - दैनिक शिवस्वराज्य

मनगोळी गावचे सरपंच अभिमान घंटे यांची प्रहार संघटनेच्या द.सोलापूर तालुका संपर्क प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल सत्कार



समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी :-

द.सोलापूर : दि. १ जुलै सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी गावचे सरपंच अभिमान घंटे यांची प्रहार संघटनेच्या  दक्षिण सोलापूर तालुका संपर्क प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल रामकृष्ण हरी भोजलिंग महाराज ट्रस्ट आणि श्री हरी भजनी मंडळाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.
यावेळेस राम कृष्ण हरी भोजलिंग महाराज ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष नामदेव पुकळे यांनी आपले मनोगतातुन प्रहार संघटनेचे व संघटनेचे महत्त्व सांगितले.
महाराष्ट्र राज्याचे मंत्री नामदार बच्चु भाऊ कडु यांच्या कार्याची माहिती आपले मनोगतातून व्यक्त केले.
त्याच बरोबर मनगोळी गावचे माजी सरपंच समाधान घंटे यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.
प्रहार संघटनेचे दक्षिण सोलापूर तालुक्याचे नुतन संपर्क प्रमुख अभिमान घंटे यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना ते म्हणाले की आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे मंत्री नामदार बच्चुभाऊ कडू यांच्या कामाची पद्धत पाहून मी प्रहार संघटनेत  सक्रिय झाल्याचे त्यांनी सांगितले. याच वेळी ते पुढे बोलताना म्हणाले की सोलापूर जिल्हा चे प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता भाऊ मस्के पाटील, शहरप्रमुख अजित भाऊ कुलकर्णी, शहर संपर्क प्रमुख जमीर भाऊ शेख, कार्याध्यक्ष खालिद भाई मणियार, दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रहार संघटनेचे सिद्धाराम काळे, दक्षिण सोलापूर उपप्रमुख समर्थ गुंड यांनी मला सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे  असून दक्षिण सोलापूर तालुक्यात गाव तिथे प्रहार संघटनेचे शाखा ओपनिंग करून संघटना वाढवून संघटना बळकट करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य हाती घेणार असल्याचे सांगितले.

यावेळी त्या कार्यक्रमास राम कृष्ण हरी भोजलिंग महाराज ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष नामदेव पुकळे यांच्यासह.
मनगोळी गावचे प्रहार संघटनेचे अध्यक्ष गणी मामू शेख, बसू स्वामी, प्रभू सर्वगोड, व्हणकडे आनंद, मळसिध्द यलगोंडे, राम भगरे, गणेश कोळेकर, लक्ष्मण पाटील, विजय घंटे, समाधान घंटे, विकास मस्के, राजकुमार घंटे, मच्छिंद्र आईवळे, रणजीत घंटे, अभिषेक भोपळे, अमोगसिद्ध घंटे, बब्बु शेख, आरिफ भाई तांबोळी, मौला आयवळे, परशुराम हेगडे, सुभाण भाई तांबोळी यांच्यासह मनगोळी गावातील प्रहार संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads