महाराष्ट्र
पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडली, शेकडो नागरिकांचे स्थलांतर
कोल्हापूर : कोल्हापूर Kolhapur शहर आणि जिल्ह्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी देखील जोराचा पाऊस Heavy Rain सुरूच आहे. जिल्ह्यामध्ये पंचगंगा Panchganga नदी बरोबरच अन्य काही नद्यांना धोका पातळीवर वाहत आहेत. जिल्ह्यामध्ये महापूराच्या flood परिस्थितीत शेकडो कुटुंबांना जिल्हा व महापालिका Municipal Corporation प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करत आहेत.
अद्यापही बचावकार्य हे सुरूच आहे. वाहतूक सेवा Transportation service आणि नागरी जीवन Life पूर्णतः विस्कळीत झालेले आहे . हा वाढणारा पाऊस Rain आणि नद्यांची rivers पातळी यामुळे प्रशासनाचे व नागरिकांचे धांदड उडाली आहे. पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण व पोलीस Police अधीक्षक शैलेश बलकवडे हे नागरिकांच्या बचाव कार्याकरिता आणि महापूराचे संकट थांबवण्याच्या कार्यात सर्वजण व्यस्त झाले आहेत.
कोल्हापूर शहरामध्ये पंचगंगा नदी ही ४३ फूट धोका पातळी ओलांडली आहे. सध्या ५० फूटांवरून ही वाहत आहे. यामुळे शहरामधील महापुराची स्थिती अधिक गंभीर झालेली दिसून येत आहे. शहरामधील दुधाळी, उत्तेश्वरपेठ, शुक्रवारपेठ, सिध्दार्थनगर, रमणमळा, जाधववाडी, कदमवाडी, बापट कॅम्प, शाहुपुरी, लक्ष्मीपुरी कामगार चाळ आणि व्हीनस कॉर्नर या परिसरात शेकडो कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.
या कुटुंबांसाठी महापालिकेन निवारा केंद्र देखील उभा करण्यात आले आहेत. त्याठिकाणी वैद्यकीय सेवा आणि पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. कोल्हापूर मधील रत्नागिरी, राधानगरी, आजरा, गगनबावडा आणि गारगोटी हे राज्यमार्ग महापुरामुळे बंद झाले आहेत. कोल्हापूर- पुणे , कोल्हापूर- सांगली आणि कोल्हापूर- निपाणी हे मार्ग देखील बंद करण्यात आली आहे.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा