स्पर्धक क्रमांक ०००३ : अकबर बाळासो मुजावर कोल्हापूर - दैनिक शिवस्वराज्य

स्पर्धक क्रमांक ०००३ : अकबर बाळासो मुजावर कोल्हापूर

दैनिक शिवस्वराज्य आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धा २०२१-२०२२

मी... अकबर बाळासो मुजावर

सहभाग घेतला असून आपण   माझा निबंध पूर्ण वाचून तसेच View व Share करून मला ही स्पर्धा जिंकण्यास शुभेच्छा व आशीर्वाद द्यावे ही विनंती...

 स्पर्धेचा निकाल हा सादरीकरणास मिळालेले views  यावर अवलंबून आहे... 

आपण वाचलेला निबंध ,आपली अनमोल कमेंट मला या स्पर्धेत यशस्वी करण्यास निश्चित सहकार्य करेल ही आशा आहे.....

स्पर्धेची बक्षिसे :-

प्रथम क्रमांक :- १०००००/- फक्त

द्वितीय क्रमांक :- ७५०००/- फक्त

तृतीय क्रमांक :- ५००००/- फक्त

चतुर्थ क्रमांक :- २५०००/- फक्त

पाचवा क्रमांक :- १५०००/- फक्त

सहा ते दहा क्रमांक :- ५०००/- प्रत्येकी

अकरा ते शंभर क्रमांक :- १०००/- प्रत्येकी


तुम्हाला या स्पर्धेत भाग घ्यायचा असल्यास खालील क्रमांकावर प्रवेश फी Google Pay किंवा Phone Pay च्या माध्यमातून पाठवा आणि या नंबरला Whatsapp ला स्क्रीनशॉट पाठवा व तुमचा प्रवेश फिक्स करा.

प्रवेश फी :- १५० रुपये फक्त

Whatsapp क्रमांक :- 8007613469

आपला नम्र

अकबर बाळासो मुजावर


निबंधाचा विषय :-

ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण पद्धती

       एके दिवशी मी नेहमीप्रमाणे सकाळी पेपर वाचत बसलो होतो. तर माझी नजर एका बातमी वर पडली. ती बातमी अशी होती की कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे आजपासून सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद राहतील. आजपासून सर्व शिक्षण ऑनलाईन पद्धतीने होईल. ती बातमी पाहून एका क्षणार्धात मी इतिहासामध्ये हरवलो.
     आपल्या देशात एक काळ होता जेव्हा पालक आपल्या मुलांना शिक्षण आणि चांगले संस्कार देण्यासाठी गुरुकुल मध्ये पाठवत असत. लहानपणापासून तर 24 वर्षाच्या वयापर्यंत विद्यार्थी तेथे शिक्षण घेत असे. त्याला पुस्तकी अभ्यासासोबात अध्यात्मिक संस्कार आणि शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण देखील दिले जायचे. शिक्षणाच्या या प्रक्रियेला गुरुकुल पद्धती म्हटले जायचे.

         नंतरच्या काळात आधुनिक प्रगती झाली. शिक्षणाच्या पद्धती बदलून इंग्रजी शाळा व महाविद्यालये देशात आली. आज देशातील सर्वच विद्यार्थी या शाळांमध्ये शिकत आहेत आणि गुरुकुल पद्धती पूर्णपणे नाहीशी झाली आहे.
          परंतु मागील पाच वर्षात झालेल्या इंटरनेट क्रांतीमुळे देशात डिजिटल शिक्षणाची सुरुवात झाली आहे. विद्यार्थी घरबसल्या ऑनलाईन शिक्षण प्राप्त करीत आहेत. परत माझे मन वर्तमानामध्ये आले. आता जागतिक महामारी कोरोना मुळे  चालू झालेली ऑनलाईन शिक्षण पद्धती.
      
        सध्या कोरोनाच्या जागतिक संकटामुळे शाळा बंद आहेत. शाळा सुरु करण्याजोगी परिस्थिती कधी निर्माण होईल, हे आज सांगता येणे कठीण आहे. शाळा सुरु झाल्याच तरी, सामाजिक अंतराचे नियम काय असतील आणि ते पाळून शाळा पूर्ववत चालवता येतील का, हेही सांगता येणे कठीण आहे. सरकारने शाळा ‘ऑनलाईन’ सुरु करायला परवानगी दिली आहे. अनेक शाळांनी कोणत्या ना कोणत्या पद्धतीचे, ऑनलाईन उपक्रम सुरु देखील केले आहेत. पण, या साऱ्याची पुढील दिशा काय असेल? याचा विचार गांभीर्याने करायला हवा.

    आपल्याकडे मोबाईल, लॅपटॉप अशी उपकरणे वापरून, आपण अनेक गोष्टी करतो. पण या माध्यमांचा वापर करून शाळा किंवा कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक उपक्रम चालवणे, हे आपल्यासाठी पूर्णपणे नवीन आहे. कोरोनामुळे लादल्या गेलेल्या सक्तीच्या सुटीमुळे हे ऑनलाइन माध्यम एकाएकीच आपल्या गळ्यात पडले. पण या ऑनलाईन शिक्षणाची आजची परिस्थिती काय आहे? त्यासाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत? ते आज कोणत्या प्रकारे वापरले जात आहेत? या सगळ्याचे भविष्य काय असेल? या प्रश्नांचा उहापोह करताना, सर्वात महत्त्वाचे म्हणजे या साऱ्यातून आपल्याला नक्की काय साध्य करायचे आहे? ते समजून घ्यायला हवे.

     तसे पाहिले तर शिक्षणाचे तीन प्रमुख घटक असतात. अध्यापन, अध्ययन आणि मूल्यमापन या तीन घटकांसाठी शिक्षणप्रक्रिया राबविली जाते. आता हे तीनही घटक या नव्या ऑनलाईन पद्धतीत कसे आकार घेतील ते पाहूया.

     अध्यापन :- शिक्षक वर्गामध्ये जे शिकवतो ते अध्यापन. यामध्ये शिक्षकाचे व्यक्तिगत कौशल्य, वक्तृत्व, विषय मांडण्याची आणि समजावून सांगण्याची कला हे अंतर्भूत असते.

     अध्ययन :- विद्यार्थी स्वतःच्या प्रयत्न आणि आकलनाने जे शिकतात ते अध्ययन. यामध्ये शिक्षकांनी सांगितलेली अभ्यास सामग्री वाचणे, संबंधित अध्ययन साधने  बघणे किंवा अनुभवणे, दिलेला गृहपाठ करणे यांचा समावेश असतो.

      मूल्यमापन :- अध्यापन आणि अध्ययनातून विद्यार्थी किती शिकला आहे, याची पडताळणी करणे म्हणजे मूल्यमापन. यामध्ये गृहपाठाची तपासणी करणे, घटक चाचण्या घेणे आणि परीक्षा घेणे यांचा समावेश असतो.

      ऑनलाईन शिक्षणाचा विचार करताना, हे तीनही घटक ऑनलाईन माध्यमांमधून पूर्ण करता येतील अशी व्यवस्था किंवा प्रणाली वापरायला हवी.

     सध्याची परिस्थिती बघता बहुसंख्य शाळा अथवा प्रशिक्षक फक्त ‘अध्यापन’ ऑनलाईन करण्यावर भर देत आहेत, असे दिसत आहे. झूम किंवा गूगल मीट सारखे तंत्रज्ञान वापरून शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा व्हिडियो कॉल सेटअप करणे आणि त्यात शिक्षकांनी वर्गात बोलतात, त्याप्रमाणे बोलून शिकवणे अशी सध्याच्या बहुसंख्य ऑनलाईन वर्गांची परिस्थिती दिसत आहे. काही कल्पक शिक्षक आपल्या लेक्चरचे पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन करून, ते व्हिडियो कॉलवर दाखवतात आणि विषय समजावून सांगतात. काही शिक्षक फळा समोर ठेवून, त्यावर वर्गात शिकवत असल्यासारखे खडूने मुद्दे लिहून शिकवतात. तर काहीजण नुसतंच व्हिडियो कॉलवर बोलल्यासारखे बोलतात. अर्थात, यात शिक्षकांचा काही दोष आहे, असे मला वाटत नाही. शिक्षकांचे सर्व प्रशिक्षण हे वर्गात शिकवण्याच्या दृष्टीने झालेले असताना आणि वर्गात शिकवण्याचाच अनुभव त्यांच्यापाशी असताना अचानक ऑनलाईन अध्यापन करावे लागणे, हा त्यांच्यासाठी प्रचंड मोठा बदल आहे. यासाठी त्यांचे प्रशिक्षण झालेले नाही किंवा अगदी कमी वेळात तशी तयारी त्यांना करावी लागली आहे.

     दुसऱ्या घटकाचा, अध्ययनाचा, विचार केला, तर त्यासाठी आज प्रामुख्याने पारंपारिक साधने आणि पद्धतीच वापरल्या जात आहेत. अध्ययनाचे पारंपारिक साधन म्हणजे पाठ्यपुस्तक आणि पद्धत म्हणजे पुस्तकातले धडे वाचून त्याखालची प्रश्नोत्तरे सोडवणे. खरेतर कोणताही विषय शिकण्यासाठी आजच्या ऑनलाईन जगात प्रचंड मोठ्या प्रमाणावर रिसोर्सेस उपलब्ध आहेत. युट्यूबवरचे व्हिडियोज, विकिपीडियासारखे माहितीचे संग्रह इथपासून ते अनंत ब्लॉग्ज आणि माहितीचे संकलन करणाऱ्या वेबासाईट्स उपलबद्ध आहेत. असे असताना अध्ययनासाठी फक्त पाठ्यपुस्तकावर अवलंबून रहाणे, हे शिक्षण मर्यादित चाकोरीमध्ये अडकवून ठेवण्यासारखे आहे. काही शाळांमधले काही शिक्षक, अशी साधने वापरायला मुलांना प्रोत्साहन देत आहेत, मात्र बहुसंख्य ठिकाणी ऑनलाईन माध्यमाचा प्रभावी वापर करून, अध्ययन पाठ्यपुस्तकापलिकडे नेण्याचा प्रयत्न होणे गरजेचे आहे.

       मूल्यमापनाची पारंपारिक पद्धत म्हणजे वेळोवेळी घेतल्या गेलेल्या चाचण्या आणि परीक्षा. छोट्या चाचण्यांसाठी ऑनलाईन माध्यमांमध्ये स्पर्धा, सर्वेक्षण किंवा मतचाचणी सारखी तंत्र वापरता येऊ शकतात किंवा गूगल फॉर्मस वापरून मुलांकडून प्रश्नोत्तरे मागवता येऊ शकतात. सध्या मात्र मूल्यमापनासाठी कागद-पेन या पारंपारिक साधनांचाच वापर होताना दिसत आहे. शिक्षकांनी प्रश्नोत्तरे स्कॅन करून पाठवणे, त्याचा प्रिंटआउट काढून त्यावर ती सोडवणे आणि ते स्कॅन करून शिक्षकांना परत पाठवणे किंवा वहीत प्रश्नोत्तरे लिहून, त्याचा फोटो शिक्षकांना पाठवणे हे बहुसंख्य ठिकाणी केले जाताना दिसत आहे.

      एकूणात अध्यापन, अध्ययन आणि मूल्यमापन या शिक्षणाच्या तीन अंगांपैकी प्रामुख्याने अध्यापन ऑनलाईन केले जाताना दिसत आहे. परंतु तिथेही ऑनलाईन माध्यमाची पूर्ण क्षमता वापरली जात आहे, असे दिसत नाही. म्हणून अचानक माझ्या डोक्यामध्ये एक प्रश्न डोकावला कि, ऑनलाईन शिक्षण पद्धती विद्यार्थ्यांसाठी योग्य आहे की अयोग्य?

       शाळा चालवण्यासाठी शाळेच्या इमारती, मैदाने यांचे  इन्फ्रास्ट्रक्चर लागते. शहरांपासून ते खेड्यांपर्यंत प्रत्येक मुलाच्या घराजवळ शाळा हवी असेल तर त्यासाठी लागू शकणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी महाकाय गुंतवणूक करावी लागते. पण या ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये हा प्रश्नच उद्भवत नाही. म्हणजेच महाकाय गुंतवणूक करण्याची आवश्यकता नसते आणि शिक्षण सर्वदूर पोहोचवता येते.
      पण या ऑनलाईन शिक्षणाच्या काही मर्यादा पण आहेत. त्यामध्ये सगळ्यात मोठी मर्यादा म्हणजे ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थी काही गोष्टी करु शकत नाहीत जसे की, आपल्या समवयीन मुलांमध्ये गटाने एकत्र रहाणे, एकमेकांशी मैत्री करणे, मैदानात एकत्र खेळणे, दंगामस्ती करणे इत्यादी. या सगळ्यातून आपोआप शिकले जाणारे सामाजिक वर्तनाचे नियम, सामाजिक शिस्त आणि संबंधित सोशल स्किल्स ही ऑनलाईन शिक्षणातून देता येत नाहीत. याचबरोबर ऑनलाइन शिक्षणासाठी शिक्षक आणि विद्यार्थी दोघांकडेही परीक्षा क्षमतेची तांत्रिक उपकरणे जसे की स्मार्टफोन्स, टॅबलेट्स, लॅपटॉप्स. तसेच पुरेशी बँडविड्थ असलेले आणि सतत सुरू असलेले हाय स्पीड इंटरनेट असणे गरजेचे असते पण सर्वच विद्यार्थी किंवा शिक्षकांना ही साधने परवडतातच असे नाही. ग्रामीण भाग, शहरी कनिष्ठ आणि निम्न मध्यमवर्ग सोडा, अगदी मध्यमवर्ग आणि उच्च मध्यमवर्गातही मुलांना त्यांच्या मालकीचा स्मार्टफोन किंवा लॅपटॉप देणे सगळ्यांनाच शक्य नसते. म्हणजे ऑनलाइन शिक्षण ज्यावर मिळतं ती उपकरणे हातात नाहीत आणि ज्या द्वारे मिळते त्या कनेक्टिव्हिटी ची खात्री नाही, अशी बहुसंख्य विद्यार्थ्यांची अवस्था आहे. तर मग आम्हा सर्वांना एक प्रश्न पडतो की कोणती पद्धती विद्यार्थ्यांसाठी योग्य ठरू शकते ऑनलाइन शिक्षण पद्धती की ऑफलाइन शिक्षण पद्धती?

      आजच्या परिस्थितीचा आणि भविष्याचा विचार करता असे वाटते की, संमिश्र शिक्षण पद्धती योग्य ठरू शकते. ऑनलाइन शिक्षण व्यवस्था ही काळाची गरज आहे. अत्यंत कमी खर्चात प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकेल आणि प्रत्येकाला आपापल्या आवड आणि क्षमतेनुसार घेता येईल असे शिक्षण खरोखर महत्वाचे आहे. मात्र ऑनलाइन शिक्षणाच्या काही महत्त्वाच्या मर्यादांमुळे पारंपारिक शालेय शिक्षण आणि शाळांना तो संपूर्ण पर्याय ठरेलच असे नाही. म्हणूनच संमिश्र शिक्षण पद्धती ही भविष्यातील महत्त्वाची शिक्षण पद्धती असेल. जे विषय ऑनलाइन शिकता येणे शक्य आहे त्यांचे अध्यापन-अध्ययन ऑनलाईन होणे. जे विषय प्रत्यक्ष एकत्र येऊनच शिकावे लागतात त्यासाठी शाळांसारख्या संस्थांमध्ये एकत्र येणे, अशा दोन्ही पद्धतींचा वापर येणाऱ्या काळात करावा लागेल. आणि हीच असेल भविष्यातील योग्य शिक्षण पद्धती म्हणजेच संमिश्र शिक्षण पद्धती.

       धन्यवाद

Previous article
Next article

30 Comments to

  1. कृपया सर्वांनी इथे कमेंट करावी🙏🤗

    उत्तर द्याहटवा
  2. Good thinking and also good expression of the subject

    उत्तर द्याहटवा
  3. Lack of knowledge you have explained...very nice thoughts

    उत्तर द्याहटवा
  4. संमिश्र शिक्षण प्रणाली ही कल्पना वापरण्यायोग्य आहे आणि येणाऱ्या पिढीसाठी महत्त्वाची सुद्धा.

    उत्तर द्याहटवा
  5. Khup chan explain kele ahe.. ani मुद्देसूद मांडणी केली आहे. खूप छान

    उत्तर द्याहटवा
  6. खूपच मस्त मांडणी केली आहे, आत्ताच्या कोरोना च्या पार्श्वभूमीवर खूप मस्त असे लेखन केले आहे..

    उत्तर द्याहटवा
  7. मस्त दादा तुमचे विचार पटले आम्हाला.........!!
    खुप छान सादरिकर केलं मस्त.....!!
    बेस्ट ऑफ luck....!!

    उत्तर द्याहटवा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads