दैनिक शिवस्वराज्य आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धा २०२१-२०२२
मी... दयाराणी राहुल शेलार
सहभाग घेतला असून आपण माझा निबंध पूर्ण वाचून तसेच View व Share करून मला ही स्पर्धा जिंकण्यास शुभेच्छा व आशीर्वाद द्यावे ही विनंती...
स्पर्धेचा निकाल हा सादरीकरणास मिळालेले views यावर अवलंबून आहे...
आपण वाचलेला निबंध ,आपली अनमोल कमेंट मला या स्पर्धेत यशस्वी करण्यास निश्चित सहकार्य करेल ही आशा आहे.....
स्पर्धेची बक्षिसे :-
प्रथम क्रमांक :- १०००००/- फक्त
द्वितीय क्रमांक :- ७५०००/- फक्त
तृतीय क्रमांक :- ५००००/- फक्त
चतुर्थ क्रमांक :- २५०००/- फक्त
पाचवा क्रमांक :- १५०००/- फक्त
सहा ते दहा क्रमांक :- ५०००/- प्रत्येकी
अकरा ते शंभर क्रमांक :- १०००/- प्रत्येकी
तुम्हाला या स्पर्धेत भाग घ्यायचा असल्यास खालील क्रमांकावर प्रवेश फी Google Pay किंवा Phone Pay च्या माध्यमातून पाठवा आणि या नंबरला Whatsapp ला स्क्रीनशॉट पाठवा व तुमचा प्रवेश फिक्स करा.
प्रवेश फी :- १५० रुपये फक्त
Whatsapp क्रमांक :- 8007613469
आपला नम्र
दयाराणी राहुल शेलार
निबंधाचा विषय : छञपती शिवाजी महाराज
"जेथे छत्रपती महाराजांचा घाम पडला. तेथे स्वराज्यनिष्ठ मावळे निर्माण झाले, जेथे मावळ्यांचे रक्त सांडले तेथे स्वराज्य निर्माण झाले, आणि जिथे या मावळ्यांच्या घोड्यांच्या टापांचा आवाज पोचला तेथील मुलुख माझ्या छत्रपतीं शिवरायांच्या स्वराज्याचा भाग बनला".......!
यांवरून लक्षात आलेच असेल की, माझ्या विषयाचे नाव काय आहे. माझ्या विषयाचे नाव आहे. 'छत्रपती शिवाजी महाराज' छत्र म्हणजे छाया जशी अंधाराला उजेडाची असते,या स्वराज्यातील रयतेला आपल्या ममत्वाच्या छञ छायेत विसावा देऊन या स्वराज्यातील मावळ्यांना सोबत घेऊन या स्वराज्याचा 'नवनिर्माता लढवय्या छत्रपती' बनले प्रजेच्या सुखाचा विचार करणारा व त्यांच्या दुःखाचा नाश करणारा हा 'लोकनायक' खऱ्या अर्थाने रयतेचा वाली होता.त्यांच्या सद्गुणांचा वारसा मराठी मनाला व महाराष्ट्रातील लोकांना लाभला,अशा या स्वराज्य निर्माण कर्त्याला स्वराज्या साठी लढणाऱ्या शेवटच्या क्षणापर्यंत स्वराज्याचे स्वप्न पाहणाऱ्या या छत्रपतींना माझे त्रिवार वंदन.......
सुमारे साडेतीनशे वर्षाच्या प्रदीर्घ अंधाऱ्या पारतंञ्याने काळवंडलेल्या कालखंडात महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 साली झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने 'राजपद' प्राप्त झाले. जनता जनार्दनाने आपले तारण हार छत्रपती शिवरायांना "जाणता राजा" हा किताब बहाल केला.सुसंस्कार शिक्षण, युद्धशास्त्र, राजकारण, न्यायशास्त्र, प्रजाहित दक्ष,आदर्श नेता, हिमती लढवय्या, लोक कल्याणकारी राजा, सावध नेता, कुशल संघटक, इ. असे अनेक अवर्णनीय गुण माझ्या राजाचे दर्शन घडवत होते. 'काळ्याकुट्ट अंधारात आपली दिशा ठरवून वाट कशी काढायची? कितीही संकटे आली तरी डगमगून न जाता त्यावर मात कशी करायची? बलाढ्य शत्रूशी तुटपुंज्या बळाने झुंज कशी द्यायची? आपले व आपल्या सहकाऱ्यांचे सामर्थ्य कसे वाढवायचे? शत्रूच्या कुरघोड्याना उत्तर कसे द्यायचे? या सर्व प्रश्नांना मात कशी द्यायची व स्वराज्याला यशाचे तोरण कसे बांधायचे? ही कला माझ्या छत्रपती ना अवगत झाली होती. "शक्तीपेक्षा युक्ती कशी श्रेष्ठ असते" हे आनेक लढाया जिंकून छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी 'बहुजन हिताय, बहुजन सुखाय' या उपमांचा प्रत्यय आणून दिला. महाराजांनी स्वराज्यातील प्रत्येक क्षेत्रात आमूलाग्र क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न केला. ठेकेदारी, सावकारी, दलाली या शाप ठरलेल्या गुलामगिरीतून समाजाला मुक्त केले. त्यांचा स्वभावच 'परमार्थ सहिष्णू उदारमतवादी' होता त्यांचे निष्कलंक चारित्र्य,शुद्ध मन, सद्भावना, सरळ स्वभाव हे त्यांचे निर्मळ चरित्र दर्शवत होते. मुत्सदी चतुर दूरदर्शी पराक्रमी लढणारा जाणता राजा दुसऱ्या धर्माचा द्वेष न करता सर्वधर्म समभाव ही भावना बाळगून राहणारा 'लोकहितवादी दक्ष राजा'......! आजच्या काळातील त्यांचे अनुयायी त्यांची जयंती साजरी करताना डॉल्बी, डीजे अशा काही अघटित गोष्टीना थारा देऊन त्यांची जयंती साजरी करतात खरेच त्यांचे अनुयायी त्यांना खऱ्या अर्थाने कधी ओळखतील का? सध्याच्या काळात जेव्हा एखाद्या कर्तुत्व व्यक्तिमत्त्वाची उणीव भासते, तेव्हा भूतकाळातील कर्तव्यनिष्ठ स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण होते. आणि आता तर ही महाराष्ट्रातील अंदाधुंदी पाहिली की मनात विचार येतो माझे छत्रपती राजे असते तर...........
"लढणारे ते मावळे होते झुंजणारा तो राजा छत्रपती होता आईच्या मायेने जवळ घेणारा माझा राजा लाखात एक नव्हता तर जगात एक होता" म्हणूनच वाटते की, येणाऱ्या काळाने जरी विचारले कोणाच्या देशातून आला आहेस,तर उत्तर आले पाहिजे ज्यांनी मरणालाही जगायला शिकवले,व आलेल्या मरणालाही लाजवले अशा छत्रपती शिवाजी व छत्रपती संभाजी महाराजांच्या स्वराज्यातून व या स्वराज्यासाठी जीव पणाला लावणाऱ्या मावळ्यांच्या पावन पवित्र अशा महाराष्ट्रातून आलो आहे. आणि म्हणूनच छत्रपतींचे नाव आम्हाला धैर्य निष्ठा परंपरा व ताकद जोपासायला प्रकाश देत राहील अगदी जगाच्या अंतापर्यंत........
जेवढे कुतुहलाने लिहावे तेवढे कमी आहे माझ्या राजा विषयी.शब्दानाही अंत आहे पण माझ्या राजाच्या आठवणींना व त्यांच्या गुणांना अंत नाही या निबंध स्पर्धेच्या निमित्ताने का होईना, पण माझ्या राजाचे अविस्मरणीय गुण लिहायला मिळाले यातच माझे भाग्य आहे.
!! जय शिवाजी जय भवानी!! ....
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा