तिवरे वासियांचे दोन वर्षानंतर पुर्नवसन, मुख्यमंत्र्याच्या हस्ते झाले लोकार्पण - दैनिक शिवस्वराज्य

तिवरे वासियांचे दोन वर्षानंतर पुर्नवसन, मुख्यमंत्र्याच्या हस्ते झाले लोकार्पण


राकेश कोळी उपसंपादक :-

२ जुलै २०१९ ला आमवस्येच्या रात्री चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील धरण फुटल्याने एका रात्रीत २३ घरे वाहून गेली होती. तर २२ जणांचा या दुर्घटनेत बळी गेला होता. या धरण ग्रस्तांसाठी उभारण्यात आलेल्या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने करण्यात आला. यावेळी २४ जणांना घरांचे हस्तांतरण करण्यात आले. यासाठी सिध्दीविनायक ट्रस्टने दिलेल्या ५ कोटीच्या निधीतून ही घरे उभारण्यात आली. उर्वरित धरणग्रस्तांना ही १ वर्षाच्या आतच घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी लागणाऱ्या ७ कोटींचा प्रस्ताव व आराखडा तयार करून तातडीने पाठवून द्या. त्यासाठी लागणार निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
यावेळी मुख्यमंत्री श्री. उध्दव ठाकरे पुढे म्हणाले की, तिवरे धरणग्रस्तांना नवीन घरे देतांना आजुबाजूच्या परिसरात पुन्हा अशा घटना घडणार नाहीत याची काळजी घ्या. अनियमित पावसामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता असते हे लक्षात घेऊन राज्यभरात अशाप्रकारे घटना घडू नयेत यासाठी सावधगिरी बाळगण्याच्या सुचना ही दिल्या आहेत. झालेले आर्थिक नुकसान भरून काढता येते परंतू मनुष्य हानी ही न भरून येणारी असते. त्यामुळे एकही जीव जाऊ न देणे यासाठी प्रथम प्राधान्य देण्याची गरज असल्याचे मत मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी मंत्री उदय सामंत, सिद्धीविनायक मंदिर अध्यक्ष आदेश बांदेकर, खासदार विनायक राऊत यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले
चिपळुण तालुक्यातील अलोरे येथे २ वर्षापुर्वी झालेल्या दुर्घटनेतील धरणग्रस्तांना सिद्धी विनायक ट्रस्टच्या निधीतून ही घरे बांधून देण्यात आली. त्या घरांची चावी अपग्रस्तांना देण्याचा कार्यक्रम दि.२ जूनरोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्स व्दारे करण्यात आला. या कार्यक्रमाला परिवहन मंत्री तथा पालकमंत्री अॅङ अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री उदय सामंत, सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष श्री आदेश बांदेकर, खासदार विनायक राऊत जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, आमदार भास्कर जाधव, शेखर निकम, मुख्य सचिव सीताराम कुंटे, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा व इतर मान्यवर उपस्थित होते.


धरण फुटीचा अहवाल गेला कुठे?, २ वर्षापासून धरणग्रस्त न्यायाच्या प्रतिक्षेत

२ जुलै २०१९ च्या अमावस्येच्या रात्री चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटले होते. या धरणानजिक 
असलेल्या भेंदवाडी पुर्णपणे होत्याचं नव्हतं झाल. यामध्ये भेंदवाडीतील २३ घरे, जनावरांचे गोठे आणि २२ जण धरणाच्या पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेले. या दुर्घटनेत एकूण २२ जण बेपत्ता झाले असून त्यापैकी २१ जणांचे मृतदेह सापडले. मात्र दीड वर्षाची दुर्वा ही अद्यापही बेपत्ता आहे. या दुर्घटनेतील ग्रस्तांना केंद्र सरकारकडून दोन लाख तर राज्याने नैसर्गिक आपत्ती निधीतून चार लाख, राज्य शासनाकडून सहा लाखांची मदत करण्यात आली होती. तिवरे धरणफुटीला आज शुक्रवारी २ जुलै रोजी २ वर्षे पूर्ण झाली असून दोन वर्षानंतर बाधितांसाठी बांधलेल्या घरांचे लोकार्पणदेखील झाले. मात्र २ वर्षापासून धरणफुटीची कारणे शोधण्यासाठी शासनाने स्थापन केलेल्या विशेष चौकशी पथकाचा व पुनर्विलोकन समितीचा चौकशी अहवाल आजही गुलदस्त्यात आहे. या धरणग्रस्तांना आज केवळ घरे मिळाली पण न्याय अद्याप मिळालेला नाही. या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर अद्याप कसलीही कारवाई झालेली नाही. या धरणफुटीचा अहवाल अद्यापही कुठे अडकला आहे याचा शोध प्रशासनाने घ्यावा. दुर्घटनेला २ वर्षे पूर्ण होऊन ही हे आपत्तिग्रस्त न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads