महाराष्ट्र
जय मल्हार करिअर अकादमी व मॉर्निंग क्रिकेट क्लबने जपली सामाजिक बांधिलकी
प्रतिनिधी : रविना यादव
आजच्या २१ व्या धावत्या युगात कोण कोणाचे राहिलं नाही.आणि या कोरोना महामारी ने सुद्धा हे दाखवून दिले आहे.तरीदेखील प्रत्येक जण आपल्याच धुंदीत आहे. आणि माणुसकी हरवत चालली आहे.आपल्याच कामात व्यस्त आहे. विनाशाकडे वाटचाल सुरू आहे हे दिसत असतानाही,माणूस माणसाशी माणसाप्रमाणे वागत नाही.परंतु सत्याला कोठेतरी न्याय नक्कीच मिळत असतो. असेच एक उत्तम उदाहरण म्हणजे, खटाव तालुक्यातील वडूज या गावातील .
गेली कित्येक काळापासून पोटाची खळगी भरण्याच्या उद्देशाने गावोगावी भटकंती करून यात्रा ,जत्रा यांच्या माध्यमातून स्टेशनरी व्यवसाय ,तसेच फुगे विकणे ,गारीगार विकणे,असा व्यवसाय करणारे श्री .रमेश जाधव ,यांचे चिरंजीव अशोक जाधव हे सध्या हृदयविकाराने डॉक्टर भोईटे बारामती येथे मृत्यूशी झुंज देत आहे.सदर कुटुंबाने त्यांच्या परीने प्रयत्न सुरू ठेवले असताना,श्री जाधव हे श्रीयुत .बनाजी पाटोळे सर ,यांच्याकडे आले असताना ही सगळी परिस्थिती सांगितली .यावर लगेच सरांनी ही माहिती आपल्या सवंगड्यांना व जय मल्हार करिअर अकादमी च्या विद्यार्थ्यांना दिली. क्रिकेटच्या मैदानावरती रोज नवीन बॅट आणि बॉल नवा घेण्यासाठी धडपडनारे ,आपण आपलं कर्तव्य पार पाडणे च्या निमित्ताने जाधव कुटुंबीयांच्या या अडचणीच्या प्रसंगी जय मल्हार करिअर अकादमी व मॉर्निंग क्रिकेट क्लब तर्फे खारीचा वाटा उचलत एका रक्कमेच्या माध्यमातून त्यांना आधार दिला. दान केल्याने आयुष्य वाढते.असे विधान प्रसाद जगदाळे यांनी मांडले .तसेच सर्वजणांनी मिळुन परमेश्वराकडे प्रार्थना केली की, श्री अशोक जाधव ही व्यक्ती लवकर बरी होऊन सुखरूप घरी यावी. प्रत्येकाच्या घरी कोण तरी आपली वाट पाहत असतं.याचं आपुलकीच्या नात्याने मदतीचा हात पुढे करून, जय मल्हार करिअर अकादमी व मॉर्निंग क्रिकेट क्लब ने माणुसकीचा ओलावा जपला .
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा