महाराष्ट्र
मंद्रुप सीतामाय तलावात कालव्याद्वारे सोडण्यात येणार्या पाण्याचे आ.सुभाष देशमुख यांच्या हस्ते जलपूजन.. मंद्रुप एमआयडीसीमुळे युवकांना रोजगार उपलब्ध होणार - आ.सुभाष देशमुख
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनीधी
सोलापूर(मंदूप) : मंद्रुप येथील सितामाई तलावामध्ये कुरुल कॅनॉल फाटा येथून जमिनीतून पाईपलाईनद्वारे पाणी आणण्याचे प्रयत्न यशस्वी झाल्याने मंद्रुप येथील अमोगसिद्ध बन(देवालय) येथे जलपूजन तालुक्याचे आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आ.सुभाष देशमुख म्हणाले कि या कुरुल कॅनॉल फाट्यावरुन पाईपलाईनद्वारे आणलेल्या पाण्यामुळे मंद्रुप परिसरातील शेतकऱ्यांना सितामाई तलावाचे पाणी पाझरून विहिरी व बोअर याला पाणी येईल. व या परिसरातील पाचशे एकर जमीनीला या सितामाई तलावातील पाण्यामुळे फायदा होणार आहे.
मंद्रुप तालुका आणि मंद्रुप मधील युवकांना रोजगार उपलब्ध
होण्यासाठी औद्योगिक वसाहत होणे गरजेचे आहे. मंद्रूपमध्ये कुरघोट येथून पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत आहे. येळेगाव येथील कालव्यांमधून सीतामाई तलावात पाणी सोडण्याचे काम पूर्ण झाले असल्याने मंद्रूपच्या विकासासाठी औद्योगिक वसाहत होण्यासाठी शेतकऱ्यांनी विरोध न करता सहकार्य करण्याचे आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी केले.मंद्रुप येथील सीतामाई तलावात
सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे जलपूजन आमदार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी मंद्रुपचे सरपंच कलावती खंदारे, ग्रामसेवक नागेश जोडमोटे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अप्पासाहेब पाटील, तलाठी निंगप्पा कोळी, भाजप युवा नेते गौरीशंकर मेंडगुदले, माजी सरपंच विश्वनाथ हिरेमठ, मळसिध्द मुगळे,प्रभाकर कोरे, भंढारकवठे ग्रा.प.सदस्य यतीन शहा, यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा