महाराष्ट्र
महावितरणने शेती पंपाचे तोडलेले विज कनेक्शन त्वरीत जोडा अन्यथा उग्र अंदोलन :- यतीन शहा
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी
सोलापूर (मंदूप) : महावितरणने सध्या शेती पंपाचे विज कनेक्शन तोडण्याची मोहिम मोठ्या प्रमाणावर हाती घेतली आहे.सध्या शेतकरी हा मोठ्या प्रमाणावर अडचणीत असताना महावितरण कडुन जाणुन बुजुन शेतकऱ्यांचे विज कनेक्शन तोडण्यात येत आहेत.हे अत्यंत अन्याय कारक असुन तोडलेले विज कनेक्शन त्वरीत जोडण्यात यावे अन्यथा महावितरण व सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टीकडून उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपाचे तालुका सरचिटणीस यतीन शहा यांनी दिला आहे.
खरीप पीक हातातुन गेलेली आहेत रब्बी पिके जाण्याच्या मार्गावर आहेत अशा परिस्थितीत शेतकरीवर्ग संकटात सापडलेला आहे स्वताचे घर प्रपंच कसा चालवायचा या चिंतेत असताना राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून शेतकरी यांच्यावर जाणुन बुजुन अन्याय होत आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेती पंपाचे विज कनेक्शन सक्तीने विज बिलापोटी तोडले जात आहे.महावितरण कडुन चुकीच्या पध्दतीने विज बिल वसुली चालु आहे.कुठलेही महावितरण कडुन धोरण ठरलेले नसताना शेतकऱ्यांना वाजवी बिले देण्यात आली आहेत सध्या शेतकऱ्यांची पाण्याअभावी उभी पिकांची वाट लागली आहे .यातच कोरोना महामारीतुन आणि लाॅकडाऊन नैसर्गिक आपत्तीच्या कचाट्यातून शेतकरी उभा राहण्याचा प्रयत्न करीत आहे अतिवृष्टीत गेलेल्या पिकांचे अद्यापही पंचनामे नाहीत.राज्य शासनाने तुटपुंजी मदत देऊ करून तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न केला आहे.
अशा महाभयंकर परिस्थितीत शेतकरी असताना महावितरण कंपनी कडुन चुकीच्या वेळेस थकीत विज बिल वसुली चालु केली आहे.हि वसुली तात्काळ बंद करून शेतकऱ्यांचे तोडलेले विज कनेक्शन त्वरीत जोडण्यात यावेत असे नाही झाल्यास भारतीय जनता पार्टीकडून तालुक्याचे आमदार सुभाष देशमुख तसेच तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखालील महावितरण कार्यालयासमोर उग्र अंदोलन छेडण्यात येईल असा इशारा तालुका सरचिटणीस यतीन शहा यांनी दिला आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा