वक्फ बोर्डाच्या जमिनीवरील अतिक्रमणाबाबत कठोर निर्णय घेणार :- डॉ वजाहतली मिर्झा - दैनिक शिवस्वराज्य

वक्फ बोर्डाच्या जमिनीवरील अतिक्रमणाबाबत कठोर निर्णय घेणार :- डॉ वजाहतली मिर्झा



समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी
सोलापूर :-  महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड हे अल्पसंख्यांक समाजाच्या उन्नतीसाठी कार्यरत असून महाराष्ट्र राज्यामध्ये हजारो एकर जमीन अस्तित्वात आहे परंतु दुर्दैवाने सदर जमिनी चा विनियोग अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी न होता अनेक ठिकाणी अतिक्रमणे झाल्याचे दिसत आहे. भविष्यात अतिक्रमण करणाऱ्यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करणार असल्याचे महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड चे अध्यक्ष डॉक्टर वजाहतली मिर्झा यांनी प्रतिपादन केले. सोलापूर व जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार प्रकाश यलगुलवार होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्षा आमदार प्रणिती ताई शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
            या कार्यक्रमा प्रसंगी आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार अतिशय सक्षमपणे उभे आहे अनेक नैसर्गिक संकटांचा मुकाबला करत हा महाराष्ट्र राज्य जात असताना केंद्रातील मोदी सरकारच्या अनेक चुकीच्या धोरणामुळे देशातील गरीब व सर्वसामान्य जनतेला वेठीस धरले आहे. या देशाचा विकास खऱ्या अर्थाने काँग्रेस पक्षच करू शकतो. हे आता लोकांना कळून चुकले आहे येणाऱ्या महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये काँग्रेसची सत्ता येणार असून  आपल्याला काँग्रेसचा झंझावात पाहायला मिळेल.
यावेळी सरचिटणीस शकील मौलवी, शहर प्रवक्ते हसीब नदाफ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  प्रास्ताविक अल्पसंख्यांक विभाग जिल्हाध्यक्ष वसीम पठाण यांनी केले.ज्येष्ठ नगरसेवक अल्पसंख्यांक विभाग शहराध्यक्ष हाजी तोफिक हत्तुरे यांनी आभार मानले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस राशिद शेख, अ. रजाक कादरी , पश्चिम  सरचिटणीस  हाजी जे एम शिकलगार ,आयुब शेख, माजी महापौर आरिफ शेख, संजय हेमगड्डी ,ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, रियाज  हुंडेकरी, फिरदोस पटेल, शौकत पठाण, मेकाले सोलापूर जिल्हा लोकसंख्या विभाग सरचिटणीस अकबर शेख,  अप्पू शेख, सरोज पटेल, साजिद मकानदार,  फिरोज शेख,  दत्ता पवार ,उत्तर सोलापूर अध्यक्ष आतिक काझी समीर सय्यद, रफिक बागवान ,मोजीत मणियार यासह जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इलियास शेख सर यांनी केले.

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads