महाराष्ट्र
मनगोळी विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी प्रविण पाटील यांची तर व्हाइस चेअरमनपदी चंद्रकांत पुजारी यांची एकमताने बिनविरोध निवड ..
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी येथील विकास सहकारी सोसायटीची निवडणुक बिनविरोध झाली. त्या अनुषंगाने दिनांक 9 जुन 2022 रोजी चेअरमन व व्हा.चेअरमन पदाची निवडही एकमताने बिनविरोध करण्यात आली.
दक्षिण सोलापूर तालुक्यात अत्यंत चुरशीच्या समजल्या जाणाऱ्या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते. अनेक वर्षापासून लांबणीवर पडलेल्या सोसायटीच्या निवडणूका त्याचबरोबर कोरोना महामारीचे संकट टळल्यामुळे या सोसायटीच्या निवडणुकीत मतदारांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन मनगोळी येथे सोसायटी निवडणूकीत बिनविरोध निवड करण्यात आली
सोसायटी ही शेतकऱ्यांची आर्थिक नाडी असते त्यातूनच शेतकऱ्यांना पतपुरवठा करून शेती विकासासाठी हातभार लावला जातो तो पतपुरवठा सुरळीत करण्यासाठी चांगल्या उमेदवारांची व चांगल्या नेतृत्वाची गरज असते म्हणून मतदाराने या निवडणुकीमध्ये बिनविरोध निवड करण्यात आली .या निवडणुकीचे निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून गाडेकर मॅडम यांनी काम पाहिले.
निवडणुक बिनविरोध करण्यासाठी गावचे जेष्ठ नागरिक विठ्ठल घंटे , पापा शेख, माजी चेअरमन भारत घंटे, नंदकुमार मोरे ,नवनाथ चव्हाण ,पोलिस पाटील गुंडू पाटील यांनी प्रयत्न केले. व स्वागत सत्कार माजी विद्यमान चेअरमन संजय (भाऊ)गायकवाड यांनी केले.
मनगोळी विविध सहकारी सोसायटीचे सदस्य पुढीलल प्रमाणे :-प्रविण सुर्यप्रकाश पाटील, चंद्रकांत शिवाजी पुजारी, संजय सारंग गायकवाड, अंकुश आप्पा खांडेकर, माणिकबाई गोवर्धन जाधव, महादेव मारुती मोरे, आश्विनी विनोद घंटे, विश्वजित दिलीप भुसे, गणपत सुखदेव आंबुळे, श्रीकांत हणमंत घंटे, रशिद लतिफ शेख, बाबासाहेब सदाशिव फडतरे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश हसापुरे यांनी भुषविले.
कार्यक्रमास सुरेश हसापुरे यांच्यासह,प्रमुख पाहुणे होटगी स्टेशन उपसरपंच सुभाष पाटोळे, वडापुरचे माजी सरपंच बंडू वाघचौरे, सुधाकर जोकारे,अंत्रोळीचे जेष्ठ कार्यकर्ते गणेश कर्वे, सामाजिक कार्यकर्ते अकोले सरपंच रमेश आसबे, सोसायटी सचिव मरगुर,गावडेवाडीचे पोलिस पाटील विजय गावडे व कैलास पांढरे बिरू गावडे कंदलगावचे सोसायटी चेअरमन शाम व्हनमाने, व्हा चेअरमन योगेश जोकारे, संचालक विजय कुलकर्णी, संचालक बापु गावडे, सचिव सुधाकर जोकारे, संजय कोले, दयानंद स्वामी , किसन रणदिवे व शेतकरी बहुसंखेने उपस्थीत होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अमोल धनवे पाटिल सर यांनी केले तर प्रास्ताविक लक्ष्मण पाटील यांनी केले.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा