सिना - भीमा नदी काठावरील नागरिकांना मंद्रुप पोलीस स्टेशन कडुन आवाहन.. - दैनिक शिवस्वराज्य

सिना - भीमा नदी काठावरील नागरिकांना मंद्रुप पोलीस स्टेशन कडुन आवाहन..


समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) : भीमा नदी पात्रात उजनी धरणातून उजनी धरण 108 % भरल्याने नदीपात्रात 60,000 कुसेक पेक्षा जास्त विसर्ग सोडलेला आहे. तसेच सिना नदीच्या पाणलोट भागात पाऊस झाल्याने सिना विसर्ग पाण्याचा विसर्ग वाढला आहे. त्यामुळे नदी काठावरील सर्व गावातील नागरिकांनी गावातील बंधाऱ्यावर पाणी येण्याची शक्यता असल्याने बंधाऱ्यावरून वाहतूकीचे धाडस करू नये, तसेच नदीमध्ये बुडालेल्या शेताच्या पाण्याच्या मोटारी काढण्याचेही धाडस करू नये. असे धाडस जीवावर बेतू शकते.  
      बऱ्याच ठिकाणी नद्यांना ,ओढ़याना पुर येऊन पुलावरुण पाणी वाहत असेल तर ,आपणास माहीती असावे की वाहनाचे टायर मधे हवा असल्याने चाकाचे निम्म्याचे वर पाणी आले की टायर उचलतात व वाहन पाण्याबरोबर वाहून जाते. तसेच माणसाचे पाय पाण्यात जमिनीला चिटकुंन जोपर्यन्त असतात तो पर्यन्त पाण्याचे प्रवाहात माणूस टिकतो, परतुं गुढग्याच्या वर पाणी गेले की पाय उचलायला चालु होतात व पाण्याचे प्रवाहाबरोबर माणूस वाहु लागतो. तरी सर्वानी आशा वेळी ओढा व नाल्यातील पाणी कमी होण्याची वाट पहावी. जीव धोक्यात घालू नये. तसेच लाइटचे पोल, लाइट डीपी ओले झालेले असतात त्यात विद्युत प्रवाह आसु शकतो तरी योग्य ती खबरदारी घ्यावी. असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांनी केले आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads