जामनेर तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी अवकाळी पाऊसामुळे झालेल्या नुकसानीची केली पाहणी
जळगाव जिल्ह्यात जामनेर तालुक्यात अचानक सोसाट्याच्या वार्यासह आलेल्या अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. जामनेर तालुक्यात वातावरणात अचानक बदल होऊन आलेल्या वादळी वारा व मुसळधार पाऊस झाल्यामुळे येत्या काही दिवसांत काढणीला आलेल्या कपाशी , केळी पिकांचे आदी नुकसान झाले आहे.जामनेर तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक, वडगाव आदी गावांना या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानीची तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी नुकसानीची पाहणी केली.नुकसानीचे पंचनामे करून अहवाल शासनाकडे पाठविला जाईल अशी माहिती तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी दिली आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा