स्वच्छतेच्या कामाकडे शहापूर ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष...
जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे
जामनेर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका झाल्या आणि थांबलेला गावगाडा पुन्हा सुरू झाला. आपल्या समस्या सुटतील अशा आशा गावातील ग्रामस्थांना होती. पण सत्तेत आलेल्यांनी गावकऱ्यांच्या समस्या सोडवल्या की उलट समस्या वाढल्या आहेत, याचे ताजे उदाहरण समोर शहापूर गावात आले आहे.जामनेर तालुक्यातील शहापूर या गावातील संपूर्ण रस्त्यांवर घाणीचे साम्राज्य पसरले असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासन मात्र पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार इथल्या गावकऱ्यांनी केली आहे.या संदर्भात गावातील ग्रामस्थांनी वारंवार शहापूर ग्रामपंचायत ला वारंवार तक्रारी करून सुद्धा गावातील गटारी, केर कचरा, स्वच्छलय ची सफाई होत नसल्याने, गावातील ग्रामस्थांनी स्वतः राबून गावात स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. गावामध्ये मूलभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे. ह्या सुविधा पुरवण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरत आहे. गावातील काही ठिकाणी सांडपाणी रस्त्यावर खड्डे साचले आहे. तर काही नागरिकांनी सांडपाण्यासाठी असलेले शोषखड्डे देखील बुजवून घेतल्याने हे संपूर्ण सांडपाणी रस्त्यावर तुंबल्याने सर्वदूर गटारे साचली आहेत, असा आरोपही गावकऱ्यांनी केला आहे. साचलेल्या पाण्यात मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत आहे. सोबतच दुर्गंधीमुळे देखील नागरिक बेजार झाले आहेत. आता जिल्ह्यामध्ये डेंग्यू आणि मलेरियाचा प्रादुर्भाव होत असल्याने या घाणीचे साम्राज्य परसल्याने गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.यावर स्थानिक ग्रामपंचायत, ग्रामसेवक, दुर्लक्ष करीत असून, याची तक्रार पंचायत समिती तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे करणार असल्याचे ग्रामस्थांनी यांनी सांगितले.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा