सरपंच परिषदेच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पदी श्री राजमल भागवत यांची नियुक्ती
सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र मार्फत जामनेर तालुक्यातील सरपंचांची बैठक संपन्न झाली. सभागृहात अनेक समस्यांवर चर्चा करण्यात आली.
जामनेर -ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाचा विकास साधण्यासाठी सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र ही परिषद कार्यरत आहे. या परिषदेच्या माध्यमातून जामनेर पंचायत समितीच्या सभागृहा मध्ये नियोजन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जामनेर तालुक्यातील सरपंच उपसरपंच व सदस्यांचा सत्कार सोहळा संपन्न करण्यात आला.तसेच संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री दत्ताभाऊ काकडे यांच्या आदेशाने सरपंच परिषद उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पदी श्री राजमल भागवत यांची नियुक्ती करण्यात आली. सरपंच परिषद उत्तर महाराष्ट्र पदभार स्वीकारताच राजमल भागवत यांनी तालुक्यातील सरपंचांना परिषदे विषयीचे ध्येय धोरणे व कार्य याबद्दल मार्गदर्शन केले या कार्यक्रमाप्रसंगी पंचायत समिती गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे उपस्थित होते . कार्यक्रम प्रसंगी श्री युवराज पाटील यांनी सरपंचांना येणाऱ्या अडचणी आणि विकास काम संदर्भात अधिकारी आणि सरपंच यांचा समनवय असावा असे म्हटले तर सरपंच परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सरपंच यांचे मजबूत संघटन करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचा विश्वास बाळू धुमाळ यांनी व्यक्त केला.जामनेर तालुका कार्यकारिणी जाहीर करून यावेळी राजमल भागवत यांची उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पदी निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. सरपंच परिषदेच्या जामनेर तालुका अध्यक्ष पदी ज्येष्ठ नेते, देवपिंप्री गावाचे सरपंच~ तुकाराम निकम यांची तर ता.उपाध्यक्ष पदी~अर्जुन पाटील,रामलाल नाईक, कार्याध्यक्ष~युवराज पाटील, सचिव~कल्पेश बेलदार,तर महिला तालुका अध्यक्ष पदी~सौ.रजनीताई नाईक, उपाध्यक्ष~सौ मंगलाताई महाजन,तर कार्याध्यक्ष~ सौ.निताताई कमलाकार पाटील.यांची निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी~श्रीकृष्ण इंगळे यांनी अभिनंदन करत पुढील वाटचलीसाठी शुभेच्छा दिल्या.विस्तार अधिकारी~अशोक पालवे,विस्तार ~अधिकारी बैरागी,राजमल भागवत, बाळासाहेब धुमाळ,तुकाराम निकम,रमेश नाईक,माजी सभापती सौ.निताताई पाटील, सौ.रजनीताई नाईक,युवराज पाटील, जितेंद्र पाटील,रामलाल नाईक यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा