जामनेर तालुक्यातील शहापूर येथे अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी ग्रामदक्षता समितीची बैठक संपन्न
जामनेर तालुक्यातील शहापूर येथे खडकी नदी पात्रातून होणाऱ्या अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी ग्रामदक्षता समितीची बैठक तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
बैठकीत अवैध वाळू वाहतूक थांबवण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी सरपंच जितेंद्र बाबूराव पाटील, उपसरपंच नागेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य विशाल संतोष पाटील, नितीन पाटील, विजय पाटील, राजू राजपूत, किरण सुरवाडे, सदिप सुरवाडे, पोलीस पाटील आनंदा सुशिर, ग्रामसेवक बिजागरे, तलाठी, कोतवाल आणि ग्रामस्थ उपस्थित होते.बैठकीत ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांना जबाबदारी देऊन तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. अवैध वाळू वाहतूक थांबवण्यासाठी गावकऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा