चाकूर तालुक्यातील बंजारा बांधवानी धर्मगुरु डॉ .रामराव महाराज यांना वाहिली श्रद्धांजली
चाकूर तालुका प्रतिनिधी /मंगेश आडे :-
बंजारा समजाचे धर्मगुरु डॉ .रामराव महाराज यांच्या मृत्यू नंतर चाकूर तालुक्यातील बंजारा बांधावानी त्यांना श्रद्धांजली वाहिली.बापूच्या मृत्यू नंतर चाकूरच नव्हे तर समस्त भारत भर शोककळा पसरली आहे.
बंजारा बांधव हे दुःखामध्ये सामील आहेत, महत्वाची बाब अशी कि ,चाकूर तालुक्यातील बोथी तांडा ,हणमंत वाडी तांडा,आदी गावातल्या बंजारा भाविकानी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.बोथी तांडा येथील भावीकानी त्यांचे पोस्टर बनवून त्यांची आरती तसेच 5 मिनिट मौन पाळून त्यांच्या आत्म्यास शांती मिळावी अशी ईश्वर चरणी प्रार्थना केली. यावेळी, संतोष जाधव ,परशुराम राठोड ,नितीन राठोड,बबलू राठोड ,मारोती जाधव,लक्ष्मण जाधव,करण राठोड,ऋषीं चव्हाण,सुदर्शन राठोड,भानुदास राठोड,ऋषीं जाधव ,व समस्त गावकरी उपस्तित होते.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा