राधानगरी धरणाची कामे अजूनही प्रलंबित! - दैनिक शिवस्वराज्य

राधानगरी धरणाची कामे अजूनही प्रलंबित!


प्रतिनिधी /आकाश बारड :-
धरण पुनर्वसन व सुधारणा प्रकल्पांतर्गत देशभरातील ७३६ धरणांचे पुनर्वसन व सुधारणा केली जाणार असून, पैकी १६७ धरणे महाराष्ट्रातील आहेत. या प्रकल्पासाठी जागतिक बँक आणि एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक  आर्थिक मदत करणार आहे.
केंद्र शासनाच्या 'धरण पुनर्वसन आणि सुधारणा प्रकल्पाच्या' माध्यमातून होणारे राधानगरी धरणाचे सुधारणांचे काम लांबणीवर पडले आहे. योजनेच्या दुसर्‍या टप्प्यात राज्यातील कोयनेसह केवळ १२ धरणांचे पुनर्वसन होणार असून, शेवटच्या टप्प्यात राधानगरीसह अन्य धरणांचा समावेश होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे .
राधानगरी धरणाच्या पुनर्वसनांतर्गत एकूण १७ कोटी ६१ लाख रुपयांची कामे करण्यात येणार होती. त्यामध्ये नवीन स्वयंचलित दरवाजे बसविणे (५०.२१ लाख), कॅटवॉक ब्रिजची उभारणी (३५.०३लाख), नवीन सेवाद्वार (११८.५० लाख), विद्युतीकरण (१२.५८ लाख), पॉवर केबल उभारणी (२८.८५ लाख), प्रकाश योजना (१५.९७ लाख) आणि स्थापत्य विभागाकडील १५ कोटी रुपये खर्चाच्या कामांचा समावेश होता. आता ही सगळी कामे लांबणीवर पडणार आहेत .
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads