लॉकडाऊन काळात बंद झालेली एसटी बस सेवा जिल्हाबाह्य प्रवासी वाहतुक सेवेसाठी सुरू
डॉ गजानन वटाने/ जितूर तालूका पतिनिधी
लॉकडाऊन काळात बंद झालेली एसटी बस सेवा जिल्हाबाह्य प्रवासी वाहतुक सेवेसाठी सुरू झाली 'मिशन बिगेन' अंतर्गत ग्रामीण भागातील प्रवाशी वाहतुकीसाठी ही सेवा सुरु होईल अशी अपेक्षा होती. मात्र आज तब्बल दहा महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर देखील जिंतूर तालुक्यातील ग्रामीण भागात 'लाल परीचे' दर्शन झालेले नाही.ग्रामीण फेऱ्यासाठी बंद पडलेली एसटी सेवा तात्काळ सुरु करावी यासाठी स्थानिक पातळीवर अर्ज विनंती करूनही एसटी महामंडळाला फरक पडलेला नाही. उलट जिंतूर आगाराचे चालक-वाहक मुंबईकरांच्या सेवेसाठी पाठविण्यात आले आहेत.
अशातच ग्रामीण भागातील प्रवाशांना कामानिमित्त जिंतूरात येण्यासाठी मोटार सायकल व्यतिरिक्त पर्याय उरला नसल्याने ग्रामीण भागात ऑटो आणि खाजगी जिप चालकांच्या खाजगी वाहतुकीवर जिंतूर आणि परभणी वाहतूक पोलीसांकडून दंडात्मक कारवाईचे सत्र सुरू केले आहे. काल(दि-१५)रोजी एलदरी-वरुड-बलसा-पांगरी-भोगाव-पाचलेगाव- मालेगाव-बोरी-पिंपळगाव-भोसी या मार्गावरून खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडी चालकांवर दंडात्मक कारवाई खातर वाहने जप्त करण्यात आली आहेत. यामुळे काल दिवसभरात बाजार करून गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांना या कारवाईचा त्रास सहन करावा लागला आहे. काल दिवसभरात जवळपास अठ्ठावीस चारचाकी वाहनांवर कारवाई केल्याचे समजले आहे, यात क्रुझर गाड्यांचा अधिक भरणा असल्याचे दिसले.
एसटी बस ची ग्रामीण बस फेरी बंद असतांना नागरिकांना खाजगी वाहनांशिवाय पर्याय नाही,यात दैनंदिन बाजार खरेदीशिवाय तहसील आणि पंचायत समितीच्या कामासाठी येणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. शिवाय महाविद्यालय सुरू झाली आहेत, ग्रामपंचायत निवडणूकीसाठी उमेदवारांची जमवाजमव सुरू आहे. यासर्व पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांच्या या कारवाईमुळे सामान्य माणसाचे मात्र हाल झाले आहेत. खाजगी वाहतुकीवर कारवाई करण्याआधी ग्रामीण एसटी बस फेरी सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा