परमबीर सिंग यांच्यावर साक्षीदारांना धमकावल्याचा आरोप : वरीष्ठ पोलीस अधिकारी संजय पांडे यांचा आरोप - दैनिक शिवस्वराज्य

परमबीर सिंग यांच्यावर साक्षीदारांना धमकावल्याचा आरोप : वरीष्ठ पोलीस अधिकारी संजय पांडे यांचा आरोप


 राजकीय नेत्यांत, राजकीय पक्षांत जसे आरोप-प्रत्यारोप होत असतात, तसे आरोप वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांत सुरू झाले असून त्यातून प...

राजकीय नेत्यांत, राजकीय पक्षांत जसे आरोप-प्रत्यारोप होत असतात, तसे आरोप वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांत सुरू झाले असून त्यातून पोलिस यंत्रणा आतून कशी सडलेली आहे, हे प्रत्ययाला येते. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात लेटरबाँब टाकला, आता आयपीएस अधिकारी संजय पांडे यांनी सिंह यांच्याविरोधात तेच हत्यार वापरले असून अतिरिक्त पोलिस महासंचालक देवेन भारती यांच्याविरोधात केलेल्या चौकशी प्रकरणात साक्षीदारांना धमकावल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
मुंबई पोलिस आयुक्तपदी वर्णी न लागलेले पांडे सरकारवर नाराज आहेत. त्यातच ते ज्या पदावर होते, त्या गृहरक्षक दलाच्या महासंचालकपदी सिंह यांची वर्णी लागल्यानंतर पांडे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सिंह यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला होता. तसेच सचिन वाझे यांना ते कसे पाठिशी घालत होते, हे मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे कळविले. आता पुन्हा पोलिस दलात परतण्याची इच्छा नाही, असे एकीकडे म्हणत असताना दुसरीकडे त्यांनी सिंग यांच्याविरोधात गंभीर आरोप करणारे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. या पत्रात त्यांनी मुंबई पोलिस कसे काम करीत आहेत याची पद्धतशीरपणे माहिती दिली आहे. 1986 च्या तुकडीचे अधिकारी असलेल्या पांडे यांनी असेही लिहिले आहे की अलिकडच्या वर्षांत त्यांच्यावर काही गोपनीय चौकशीची जबाबदारी सोपविण्यात आ होती. सर्व आव्हाने असूनही त्यांनी ते ते साध्य केले. शरद पवार यांच्यासह इतर अनेक अधिकाऱ्यानी त्यांचे कौतुक केले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अतिरिक्त पोलिस महासंचालक (एडीजी) देवेन भारती यांच्याविरोधात काही तक्रारींच्या तपासाची फाइल मला दिली. मी अहवाल सादर केला, तेव्हा त्याचे(मुख्यमंत्र्यांनीही कौतुक केले होते. पोलिस आयुक्त आणि एडीजी कार्यालयाने तपासणीत अडथळे निर्माण केले, असा आरोप त्यांनी केला. पांडे यांनी पुढे लिहिले आहे की, परमबीर सिंग यांनी साक्षीदारांना धमकावले होते आणि सरकारकडे तक्रारदेखील केली होती. नंतर तत्कालीन मुख्य सचिव संजय कुमार यांच्या आदेशानुसार ही चौकशी मध्येच थांबविण्यात आली होती. दुस-या खटल्याचा हवाला देऊन पांडे यांनी लिहिले की, पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल जेव्हा फिनोलेक्स प्रकरणात पिंपरी-चिंचवडमध्ये खटला दाखल करीत नव्हते, तेव्हा मला त्याबद्दल जबाबदारी देण्यात आली होती. मी चौकशीला गेलो, तेव्हा जयस्वाल यांनी मला सांगितले की मी सक्षम पोलिस अधिकारी नाही. माझ्याविरोधात न्यायालयात खटला दाखल करण्यात आला; पण शेवटी माझ्या चौकशीत गुन्हा दाखल करण्यात आला. सर्वांत वरिष्ठ आयपीएस अधिकारी पांडे यांनी ज्या शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे आणि मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या आहेत त्यावरून असे दिसून ये,ते की सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेले पोलिस अधिकारी किती असहाय्य आहेत. पद देताना सेवाज्येष्ठता डावलून आपल्यावर कसा अन्याय करण्यात आला, याचा पाढा वाचताना ठाकरे यांना चूक सुधारण्याची संधी मिळाली होती; परंतु त्यांनी पुन्हा त्याच चुकांची पुनरावृत्ती केली, असे त्यांनी म्हटले आहे. राज्यातील सर्वात वरिष्ठ आयपीएस अधिकारी असूनही त्यांना पोलिस आस्थापना मंडळाचा सदस्यदेखील बनविण्यात आलेले नाही. माझ्या बदल्या व पोस्टिंगची चर्चा व निर्णय माझ्याहून कनिष्ठ अधिकारी घेत आहेत ही किती वेदनादायक गोष्ट आहे, अशी व्यथा त्यांनी या पत्रात व्यक्त केली आहे.

मुंडे यांना अटक करणारा अधिकारी

संजय पांडे कानपूर आयआयटीचे विद्यार्थी आहेत. 1993 च्या धारावी येथील मुंबई दंगलीत त्यांनी तत्कालीन भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना अटक केली होती. 2000 मध्ये पांडे जेव्हा ईडब्ल्यूडब्ल्यूमध्ये डीसीपी होते, तेव्हा मुंडे राज्याचे गृहमंत्री होते. पांडे यांनी चर्मोद्योग घोटाळ्याची चौकशी सुरू केली तेव्हा त्यांची बदली झाली. त्या वेळी पांडे यांनी पोलिस सेवेतूनही राजीनामा दिला होता.

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads