स्पर्धक क्रमांक ४३ स्वरांजली भगवान घरपणकर कोल्हापूर - दैनिक शिवस्वराज्य

स्पर्धक क्रमांक ४३ स्वरांजली भगवान घरपणकर कोल्हापूर


                 राजे शिवछत्रपती
      अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, स्फुर्तीस्थान  असणारे आणि  हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून ओळखले
जाणारे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.शिवराय, शिवबा, राजे अशा अनेक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव शिवाजी शहाजी भोसले असे आहे. 
           शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी  1630 रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर  शहराजवळ  वसलेल्या शिवनेरी गडावर झाला. शिवनेरी गडावरील शिवाई या देवीमुळे महाराजांचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले. 19 फेब्रुवारी म्हणजेच  शिवाजी महाराजांचा जन्मदिवस शिवजयंती म्हणून साजरा केला जातो.
            शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे आणि आईचे नाव जिजाबाई असे होते.लहानपणीच शिवरायांना दांडपट्टा, तलवारबाजी, भाला, गजा रोहन, यांचे प्रशिक्षक  मिळाले  आणि दादोजी कोंडदेव हे त्यांचे गुरु होते. वयाच्या 10 वर्षी म्हणजे 1640 मध्ये शिवाजी महाराजांचा विवाह सईबाई यांच्याशी झाला.
         वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी शहाजी महाराजांनी शिवरायांना पुण्याची जहागीर सुपूर्त केली. त्या काळात शिवरायांची संपूर्ण जबाबदारी राजमाता जिजाऊं वर होती.   जिजाऊंनी शिवरायांना रामायण- महाभारतातील गोष्टी सांगून संस्कार घडवले. त्यांनी शिवरायांना धैर्याची, कर्तृत्वाची जाणीव करून दिली.  
               वयाच्या पंधराव्या वर्षी शिवाजी काही मावळ्यांचा समवेत रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य निर्मीतीची शपथ घेतली.स्वराज्यनिर्मीतीच्या या काळात त्यांनी तोरणा गड जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. पुण्याचा कारभार पाहताना शिवाजी महाराज आणि स्वतःची राजमुद्रा तयार केली.
        ती राजमुद्रा संस्कृत भाषेत होती. स्वराज्यनिर्मीतीच्या काळात शिवाजी महाराजांना अनेक संकटांना सामोरे सामोरे जावे लागले.परंतु न डगमगता त्यांनी लढा चालूच ठेवला.प्रतापगडावर चा पराक्रम, आग्राहून सुटका,  सुरतेची लूट, शाहिस्तेखानाची फजिती या सर्व रोमांचकारी गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडत गेल्या.
          या सगळ्यातून शिवरायांचे धैर्यवान व्यक्तिमत्व दिसून येते. शिस्तबध्द लष्कर आणि प्रशासकीय यंत्रने च्या बळावर त्यांनी  सामर्थ्यशाली राज्य उभे केले. स्वराज्याचा कारभार सुरळीत चालविण्यासाठी त्यांनी अष्टप्रधान मंडळ निर्माण केले. अष्टप्रधान मंडळात योग्य लोकांची नेमणूक करून त्यांना मंडळाची पदे देऊन राज्य कारभार सुरळीत चालवला.
       गनिमीकाव्याचा उपयोग करून शिवरायांनी अनेक लढाया जिंकल्या. 6 जून 1674 रोजी शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा पार पाडला. पंडित गागाभट्टांनी राज्याभिषेकाचा विधी पार पाडला. या राज्याभिषेकात शिवरायांचा छत्रपती,क्षत्रिय कुलावंत, हिंदू धर्मो धारक, शककर्ते या नावांनी गौरव करण्यात आला.
             शिवाजी महाराज मराठी व संस्कृत भाषेचे समर्थक होते. त्यांनी स्वराज्य कारभारात नेहमी मराठी भाषेला प्रोत्साहन दिले. स्त्रियांचा नेहमी त्यांनी आदर केला. जनतेवर अन्याय करणाऱ्यांना त्यांनी कठोर शिक्षाही दिली.
                   शिवाजी महाराज हे प्रजेवर मुलाप्रमाणे प्रेम करणारे राज्य होते. 3 एप्रिल 1680 रोजी आजारपणामुळे रायगडावर शिवाजी महाराज अनंतात विलीन झाले.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads