Blog
स्पर्धक क्रमांक ४४ हर्षवर्धन सुनील पाटील कोल्हापूर
छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय इतिहासातील महान तसेच आदर्श राजा होते त्यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी या किल्ल्यावर झाला त्यांच्या आईचे जिजाबाई तर वडिलांचे नाव शहाजी भोसले असे होते शिवरायांचे बालपण खूप धामधुमीत गेले त्यांनी वयाच्या १२ वर्षापर्यंत आई जिजाऊंच्या देखरेखीखाली व शहाजी राजांनी नेमलेले या नामवंत शिक्षकाकडून अनेक कला विद्या भाषा अवगत केल्या शिवरायां पूर्वी सुमारे ४०० वर्ष महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते महाराष्ट्राचा बहुतांश भाग अहमदनगरचा निजामशहा विजापूरचा आदिलशहा यांच्या सत्तेत होता याविरुद्ध लढण्यासाठी व जनतेला कायमचे सुखी करण्यासाठी शिवरायांनी स्वराज्याचे पवित्र काम हाती घेतले त्यांनी वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले शिवराय जरी वयाने लहान असले तरी त्यांच्या मनाची भरारी प्रचंड मोठी होती त्यांनी महाराष्ट्रात जीवास जीव देणारे मावळे निर्माण केले शिवरायांनी विजापूरच्या दरबारातील भारी सरदार अफजल खानास शक्ती पेक्षा युक्ति ने धुळीस मिळवले त्यांच्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक प्रसंग महाराष्ट्रास प्रेरणा देतो शिवरायांनी इंग्रज सिद्धी व पोर्तुगिज यांना दरारा वाटावा असे भक्कम आरमार उभारले शिवाजी महाराजांना भारतीय आरमाराचे जनक म्हटले जाते त्यांनी आपल्या स्वराज्यात कधीही कोणताही भेदभाव केला नाही संतांचा विद्वानांचा सत्कार केला मंदिर व मशिदींचं रक्षण केले पर्यावरण संरक्षणाला संरक्षणाला प्राधान्य दिले स्त्रियांचा सन्मान केला असा हा आदर्श पुत्र कुशल संघटक रयतेचा वाली दुर्जनांचा कर्दनकाळ व सज्जनांचा कैवारी थोर राष्ट्रपुरुष 3 एप्रिल १६८०रोजी जनतेला दुःख सागरात लोटून अनंतात विलीन झाला जय शिवराय जय महाराष्ट्र
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा