स्पर्धक क्रमांक ४६ माया प्रदीप रिंढे सुलतानपूर - दैनिक शिवस्वराज्य

स्पर्धक क्रमांक ४६ माया प्रदीप रिंढे सुलतानपूर

अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत,स्फूर्तीस्थान असणारे आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून ओळखले जाणारे  छत्रपती शिवाजी महाराज. शिवराय,शिवबा,राजे,महाराज अशा अनेक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव शिवाजी भोसले असे आहे. शिवाजी महाराजांच्या जन्म  19 फेब्रुवारी १६३० रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवनेरी किल्ल्यावर या देवी मुळे  महाराजांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले. 19 फेब्रुवारी म्हणजे शिवाजी महाराजांना जन्मदिवस शिवजयंती म्हणून साजरा केला जातो. शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे  तर आईचे नाव जिजाबाई होते. लहानपणीच शिवरायांना दांडपट्टा, तलवारबाजी, भाला, गजारोहन, यांचे प्रशिक्षण दिले. आणि दादोज कोंडदेव हे त्यांचे गुरू होते. वयाच्या दहाव्या वर्षी म्हणजेच १६४० मध्ये शिवाजी महाराजांचा विवाह सईराणी साहेब यांच्याशी झाला. वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी शहाजी महाराजांनी शिवरायांना पुण्याची जहागीर सुपूर्त केली. त्या काळात शिवरायांची संपूर्ण जबाबदारी राजमाता जिजाऊ वर होती. जिजाऊंनी शिवरायांना रामायण-महाभारतातल्या गोष्टी सांगून संस्कार घडवले. त्यांनी शिवरायांना धैर्याची, कर्तुत्वाची  जाणीव करून दिली. वयाच्या पंधराव्या वर्षी शिवाजी महाराजांनी काही मावळ्यांसमवेत  रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य निर्मितीची शपथ   घेतली स्वराज्य निर्मितीच्या या काळात त्यांनी तोरणा गड जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. पुण्याचा कारभार पाहात असताना शिवाजी महाराजांची स्वतःची राजमुद्रा तयार केली. ती राजमुद्रा संस्कृत भाषेत होती. स्वराज्य निर्मितीच्या काळात शिवाजी महाराजांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. परंतु त्यांनी न डगमगता लढा चालूच ठेवला. प्रतापगडावर चा पराक्रम आग्राहून सुटका, सुरतची लूट, शाहिस्तेखानाची फजिती या सर्व रोमांचकारी गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडत गेल्या. या सर्वाहून शिवरायांचे धैर्यवान व्यक्ती मत्व दिसून येते. शिस्तबद्ध लष्कर आणि प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर त्यांनी सामर्थ्यशाली राज्य उभे केले. स्वराज्याचा कारभार सुरळीत चालवण्यासाठी त्यांनीअष्टप्रधान मंडळ निर्माण केले. अष्टप्रधान मंडळात योग्य लोकांची नेमणूक करून त्यांना मंडळाचे पदे देऊन राज्यकारभार सुरळीत चालवला. गनिमी काव्याचा उपयोग करून शिवरायांनी अनेक लढाया जिंकल्या ६ जून १६७४ रोजी  शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. पंडित गागा भट्टांनी राज्याभिषेकाचा विधी पार पाडला. या राज्याभिषेका शिवरायांचा छत्रपती, क्षत्रिय कुलावंतस, हिंदू धर्मोध्दारक, शककर्ते या नावाने गौरव करण्यात आला. शिवाजी महाराज मराठी व संस्कृत भाषेचे समर्थक होते. त्यांनी स्वराज्य कारभारात नेहमी मराठी भाषेला प्रोत्साहन दिले. स्त्री स्वातंत्र्याला त्यांनी नेहमी प्रोत्साहन दिले. स्त्रियांचा त्यांनी नेहमी आदर केला. जनतेवर अन्याय करणाऱ्यांना त्यांनी कठोर शिक्षा दिली. शिवाजी महाराज हे प्रजेवर मुलांप्रमाणे प्रेम करणारे राज्य होते.३ एप्रिल १६८० रोजी आजारपणामुळे रायगडावर शिवाजी महाराजांचा अनंतात निधन झाले. जय भवानी जय शिवाजी

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads