Blog
स्पर्धक क्रमांक ८६ वर्षा आनंद म्हाडगुत रायगड
राजा शिवछत्रपती
छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय इतिहासातील महान तसेच आदर्श राजा होते. त्यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३०रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई तर वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले हे होते. शिवनेरी गडावरील शिवाई यादेवीमुळे महाराजांचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले.
शिवरायांचे बालपण खुप धामधुमीत गेले.त्यांची आई जिजाऊ त्यांना झोपवताना
"जरीश्रीनी पांघरला मखमली शेला!नीज रे नीज आता शीव भुपाला! हिंदवी स्वराज्य स्वप्न पाहसी डोळा !नीज रे नीज आता शीव भुपाला!
हा सुंदर पाळणा म्हणत असत. त्यांचे पाय पाळण्यात असतानाच हिंदवी स्वराज्याची स्वप्ने पाहत होती.
शिवाजीराजेना लहानपणापासून दांडपट्टा, तलवारबाजी, भाला यांचे प्रशिक्षण मिळाले.दादाजी कोंडदेव त्यांचे गुरू होतं.
जिजाऊनी शिवबाना रामायण, महाभारत, यांच्या गोष्टी, राजकारण व श्लोक शिकवून त्यांच्यावर संस्कार केले. त्यांना धैर्याची जाणीव करून दिली.
छत्रपती शिवाजी महाराज मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. ते असे राजे होते ते जनतेसाठी जगले.,आणि गुलामगिरीच्या जगण्याला त्यांनी नाकारले. महाराजांना भवानी देवीचे वरदान होते. उद्या काय घडणार आहे हे त्यांना ज्ञात होत असे. महाराज वयांनी लहान असले तरी त्यांच्या मनाची भरारी प्रचंड होती.
वयाच्या १०व्या वर्षी म्हणजेच१६४०मध्ये त्यांचा विवाह सईबाई यांच्याशी झाला. अवघ्या १४व्या वर्षी शहाजी राजांनी शिवरायांना पुणे येथील जहागीर सुपूर्त केली. वयाच्या १५व्या वर्षी कांही विश्वासु मावळयाना जमवून शिवरायांनी स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली. वयाच्या १६व्या वर्षी तोरणागड जिंकून त्यांनी स्वराज्याचे तोरण बांधले. पुढे त्यानी कोंढाणा, विजयदुर्ग, लोहगड, पुरंदर, राजगड असे शंभराहून अधिक किल्ले जिंकले. त्यांनी युद्धात शक्तीसोबत युक्तिचाहि वापर केला .
शिवाजी राजे सर्वगुणसंपन्न होते.ते प्रजेवर मुलांप्रमाणे प्रेम करणारे राजे होते. ते संस्कृत व मराठी भाषेचे समर्थक होते. त्यांनी स्वराज्य कारभारात नेहमी मराठी भाषेला प्राधान्य दिले. पण त्यांनी दुसर्या धर्माचाहि आदर केला. त्यांच्या सैन्यामध्ये सर्व धर्मांचे सैनिक होते. शिवरायांचे शौर्य, राजधर्मपालन, कल्पकता, कौशल्य इ. गुणांनी पारतंत्र्यात देशास स्वातंत्र्य मिळवून दिले.
शिवरायांनी इंग्रज, सिद्दी व पोर्तुगीज यांना दरारा वाटावा असे भक्कम आरमार उभारले. त्याना आरमाराची जनक म्हटले जाते. त्यांनी आपल्या स्वराज्यात कधीहि कोणताही भेदभाव केला नाही. संतांचा, विद्वानांचा सत्कार केला.मंदिर व मशिदींचे रक्षण केले. सदस्यांचा सन्मान केला .
६जुन १६७४ रोजी शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. या राज्याभिषेककात छत्रपती, क्षत्रिय, कुलावतंस,हिंदु धर्मोध्दारक शतकोत्तर या नावानी
गौरव करण्यात आला.
महाडच्या ऐतिहासिक विरेश्वर मंदिरात राजे दर्शनासाठी येत असत. या ऐतिहासिक वारसा असलेल्या महागात मी राहते याचा मला सार्थ अभिमान आहे.
अशा या राजांचे कार्य व महती किती सांगितली तरी शब्द अपुरेच!
अठरा पगड जातींना एकत्र करून, जुलमी राजवट मोडीत काढत ,ज्यांनी रयतेच राज्य स्थापन केलं अशा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना माझा त्रिवार वंदन
धन्यवाद
Previous article
Next article
सुंदर लेख
उत्तर द्याहटवासुंदर लेख आहे
उत्तर द्याहटवासुंदर लेख
उत्तर द्याहटवाखूप छान
उत्तर द्याहटवाअप्रतिम
उत्तर द्याहटवाछत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण तसेच त्यांनी स्वराज्य स्थापनेसाठी वापरलेली कल्पकता व कौशल्य यांचे अतिशय सुंदर सादरीकरण या लेखात केले आहे.
उत्तर द्याहटवाखुप छान लिहिले
उत्तर द्याहटवाThis is a very nice article.
उत्तर द्याहटवाWhile reading this article I recall my childhood memories from school history lesson.
Thanks for this article....😍
Very ve
उत्तर द्याहटवाVery nice
उत्तर द्याहटवाVery nice 🙏
उत्तर द्याहटवाअठरा पगड जातीतील मावळ्यांना एकत्र करून हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यची गाथा या लेखात अतिशय सुंदरतेने सादर केली आहे.
उत्तर द्याहटवाछत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर मोजक्याच शब्दात फार मोठा आशय व्यक्त केला आहे.मुद्देसूद मांडणी आणि सर्वसमावेशक माहितीमुळे लेखन खूपच छान आहे.
उत्तर द्याहटवाछत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर मोजक्याच शब्दात पण फार मोठा आशय व्यक्त होणारा, मुद्देसूद मांडणी असणारा आणि कल्पकतेने लिहिलेला छान लेख.
उत्तर द्याहटवाछान
उत्तर द्याहटवाMast😍
उत्तर द्याहटवा