स्पर्धक क्रमांक ८१ आदित्य संजय मोरबाळे कोल्हापूर - दैनिक शिवस्वराज्य

स्पर्धक क्रमांक ८१ आदित्य संजय मोरबाळे कोल्हापूर

राजा शिवछत्रपती
     
      गगनभेदी नजर ज्यांची,
      पहाडासम विशाल काया
      धगधगता सुर्य झुकतो,
      वंदितो प्रभू शिवराया🙏
        अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, स्फूर्तीस्थान असणारे आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून ओळखले जाणारे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवराय, शिवबा, राजे अशा अनेक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव 'शिवाजीराजे शहाजीराजे भोसले' असे आहे.
        शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळ वसलेल्या 'शिवनेरी' गडावर झाला. शिवनेरी गडावरील शिवाई या देवीमुळे महाराजांचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले. १९ फेब्रुवारी म्हणजेच महाराजांचा जन्मदिवस शिवजयंती उत्सव म्हणून साजरा केला जातो. शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव 'शहाजीराजे' आणि आईचे नाव 'जिजाबाई' असे होते. लहानपणीच शिवरायांना दांडपट्टा, तलवारबाजी, भाला, गजारोहन यांचे प्रशिक्षण मिळाले आणि 'दादाजी कोंडदेव' हे त्यांचे गुरू होते. वयाच्या १०व्या वर्षी म्हणजेच १६४० मध्ये शिवाजी महाराजांचा विवाह 'सईबाई' यांच्याशी झाला.
छ- छत्तीस हत्तींचे बळ असणारे,
त्र- त्रस्त मोगलांना करणारे,
प- परत न फिरणारे,
ती- तिन्ही जगात जणणारे, 
शि- शिस्तप्रिय, 
वा- वाणिज तेज,
जी- जिजाऊंचे पुत्र, 
म- महाराष्ट्राची शान, 
हा- हार न मानणारे,
रा- राज्याचे हितचिंतक,
ज- जनतेचा राजा शिवछत्रपती🚩
        वयाच्या अवघ्या १४व्या वर्षी शहाजी महाराजांनी शिवरायांना पुण्याची जहागीर सुपूर्त केली. त्या काळात शिवरायांची संपूर्ण जबाबदारी राजमाता जिजाऊंवर होती. जिजाऊंनी शिवरायांना रामायण-महाभारतातील गोष्टी सांगून संस्कार घडविले. त्यांनी शिवरायांना धैर्याची, कर्तृत्वाची जाणीव करून दिली. वयाच्या १५व्या वर्षी शिवाजी महाराजांनी काही मावळ्यांसमवेत रायरेशवराच्या मंदिरात स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली. पुण्याचा कारभार पाहत असताना शिवाजी महाराजांनी स्वतःची राजमुद्रा तयार केली. ती राजमुद्रा 'संस्कृत' भाषेत होती. स्वराज्य निर्मितीच्या काळात शिवाजी महाराजांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. परंतु न डगमगता त्यांनी लढा चालूच ठेवला. प्रतापगडावरचा पराक्रम, आग्र्याहून सुटका, सुरतेची लूट, शाहिस्तेखानाची फजिती या सर्व रोमांचकारी गोष्टी त्यांनी त्यांच्या आयुष्यात घडवून आणल्या.
        या सगळ्यातून शिवरायांचे धैर्यवान व्यक्तिमत्व दिसून येते. शिस्तबद्ध लष्कर आणि प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर त्यांनी सामर्थ्यशाली राज्य उभे केले. स्वराज्याचा कारभार सुरळीत चालवण्यासाठी त्यांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले. अष्टप्रधान मंडळात योग्य लोकांची नेमणूक करून त्यांनी मंडळाची पदे देऊन राज्यकारभार सुरळीत चालवला. मावळे निवडताना शिवरायांनी कधीच जात-पात-धर्म बघितला नाही. याउलट अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र करून त्यांची जीवापाड काळजी घेतली. त्यामुळेच अमिषांना झुगारून संकटाशी दोन हात करताना प्रत्येक मावळा स्वराज्याशी एकनिष्ठ राहिला. मावळच्या अतिशय दुर्गम, डोंगराळ व दऱ्याखोऱ्यांच्या भौगोलिक परिस्थितीचा उपयोग महाराजांनी अनेक बलाढ्य सैन्यांना पराभूत करण्यासाठी मोठ्या कौशल्याने केला. 'ज्याचे किल्ले त्याचे राज्य' या न्यायाने स्वराज्यस्थापणेसाठी नवीन गड-किल्ले ताब्यात घेण्याची मोहीम महाराजांनी हाती घेतली. पहिले लक्ष होते कानंद खोऱ्यातील तोरणा गडावर, मजबूत पण दुर्लक्षित असा हा किल्ला. शिवरायांनी निवडक मावळ्यांसह गडावर चढाई करून मोक्याची ठिकाणे काबीज केली व स्वराज्यातील पहिला किल्ला मिळवला आणि तोरणागड जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. याच किल्ल्याची डागडुजी करताना गुप्तधन सापडले, स्वराज्य उभारणीसाठी जणू निधीच मिळाला. यानंतर तोरणागडाजवळचाच आदिलशहाचा अर्धवट बांधलेला किल्ला जिंकला. महाराजांनी स्वतःच्या देखरेखीखाली किल्ला पूर्ण बांधून घेतला व त्याला 'राजगड' असे नामकरण केले. गनिमी काव्याचा उपयोग करून शिवरायांनी अनेक लढाया जिंकल्या. ६ जून १६७४ रोजी शिवरायांचा 'राज्याभिषेक सोहळा' पार पडला. पंडित गागा भट्टांनी राज्याभिषेकाचा विधी पार पडला. या राज्याभिषेकात शिवरायांचा छत्रपती, क्षत्रिय कुलावंतस, हिंदू धर्मोद्धारक, शककर्ते या नावांनी गौरव करण्यात आला. 
        शिवाजी महाराज हे 'मराठी व संस्कृत' भाषेचे समर्थक होते. त्यांनी स्वराज्य कारभारात नेहमी मराठी भाषेला प्रोत्साहन दिले. स्त्रियांना मान सन्मान देऊन त्यांचा शिवरायांनी नेहमी आदर केला. निष्पाप जनतेवर अन्याय करणाऱ्यांना त्यांनी कठोर शिक्षाही दिली. शिवाजी महाराज हे प्रजेवर मुलाप्रमाणे प्रेम करणारे राजे होते. ३ एप्रिल १६८० रोजी आजारपणामुळे 'रायगडा'वर शिवाजी महाराज अनंतात विलीन झाले. 
       मूर्तीकेचे पावित्र्य तव राखिले
       स्वराज्यस्वप्न तव साकारिले..
       गर्जूनिया केलास हिंदोत्सव साजरा 
       शिवराया तुज मनाचा मुजरा...
 जय जिजाऊ, जय शिवराय..
Previous article
Next article

38 Comments to

  1. अतिशय अभ्यासपूर्ण निबंध लेखन, उत्कृष्ट,
    पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

    उत्तर द्याहटवा
  2. जय भवानी जय शिवाजी.. अतिशय सुंदर इतिहासिक माहिती छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर दिली आहे. पुढील वाटचालीसाठी खुप सार्‍या शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा
  3. अतिशय सुंदर लेखन व भाषाशैलीचा वापर केला आहे. आदित्य तुला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!!!

    उत्तर द्याहटवा
  4. अतिशय सुंदर व सनावली वापरून छत्रपती शिवाजी महाराजांचे विषयी उत्कृष्ट असं लिखाण केलं आहे. 👌👌

    उत्तर द्याहटवा
  5. 🚩🚩जय शंभुराजे जय शिवराय जय जिजाऊ🚩🚩

    उत्तर द्याहटवा
  6. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

    उत्तर द्याहटवा
  7. मस्तच आदि जय भवानी जय शिवराय

    उत्तर द्याहटवा
  8. मस्तच लिहिलंयस भावा��
    .
    .
    .
    .
    .
    .
    .������
    जय जिजाऊ
    जय शिवराय
    .������

    उत्तर द्याहटवा
  9. अतिशय सुंदर जय शिवाजी जय महाराष्ट्र

    उत्तर द्याहटवा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads