स्पर्धक क्रमांक ४५ देवीका प्रदीप रिंढे सुलतानपूर - दैनिक शिवस्वराज्य

स्पर्धक क्रमांक ४५ देवीका प्रदीप रिंढे सुलतानपूर

छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज मराठा समाजाचे संस्थापक होते ते असे राजे होते जे जनतेसाठी जगले   गुलामगिरीच्या जगण्याला त्यांनी नाकारले या शूर आणि पराक्रमी राजाला जनता शिवराय, शिवबा, राजे,शिव,शिवाजी महाराज,असे अनेक नावाने संबोधते छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी १६३० रोजी पुण्यातील जुन्नर शहराजवळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर झाला असे सांगण्यात येते की जिजाबाईंनी आपल्याला पुत्र व्हावा म्हणून शिवनेरी किल्ल्यावरील शिवाई देवीला प्रार्थना केली होती, म्हणूनच त्यांनी आपल्या मुलाचे नाव शिवाजी ठेवले. त्यांचे वडील शहाजी महाराज विजापूरच्या राज्याच्या सेवेत होते. बाल शिवाजी यांची पूर्ण जबाबदारी त्यांच्या माता जिजाबाईंवर होती. जिजाबाईंनी बाल शिवाजींना रामायण, महाभारतातल्या गोष्टी सांगत व राजकारणातले धडे शिकवले त्यांनी दिलेल्या संस्कारामुळे शिवाजी राजे घडले. वयाच्या पंधराव्या वर्षी काही विश्वासू मावळ्यांना जमवून शिवाजीराजांनी स्वराज्य निर्मिती ची शपथ घेतली. वयाच्या सोळाव्या वर्षी तोरणा गड जिंकून त्यांनी स्वराज्याचे तोरण बांधले. पुढे त्यांनी कोंढाणा सिंहगड‌‌, विजयदुर्ग,लोहगड, पुरंदर, राजगड, असेच शंभराहून अधिक किल्ले जिंकले त्यांनी युद्धात शक्ती सोबत युक्तीचाही वापर केला. शिवाजीराजे सर्वगुणसंपन्न होते. ते हिंदुत्व संस्कृत व मराठी भाषेचे समर्थक होते पण त्यांनी दुसऱ्या धर्माचाही आदर केला. त्याच्या सैन्यामध्ये सर्व धर्माचे सैनिक होते शिवरायांचे शौर्य, राज धर्मपालन , कल्पकता, संघटन कौशल्य इत्यादी गुणांनी पारतंत्र्यात घडलेल्या देशात स्वातंत्र्य मिळवून दिले. 3 एप्रिल १६८० रोजी राजगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. या दिवशी सह्याद्री सहित प्रत्येक व्यक्ती रडत होती. स्वतंत्र स्वराज्य व्यक्तीने निर्माण केले तो जनतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज या दिवशी जनतेपासून दुरावले जय जिजाऊ जय शिवराय

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads