शेततळ्यात बुडून दोघा बालकांचा मृत्यू - दैनिक शिवस्वराज्य

शेततळ्यात बुडून दोघा बालकांचा मृत्यू


राकेश कोळी(उपसंपादक)
सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील आरवडे येथे घरामागे असलेल्या शेततळ्यात बुडून दोन बालकांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी घडली. 
      शौर्य संजय मस्के (वय-६, रा. आरवडे, ता. तासगाव) व ऐश्वर्या आप्पासो आवटी (वय-८, रा. माधवनगर, सांगली) ही दोन बालके आरवडे-गोटेवाडी रस्त्यालगत असणाऱ्या मस्के वस्ती येथे नेहमीप्रमाणे घराबाहेर खेळत होते. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास दोघेही घराबाहेर दिसेनासे झाल्याने कुटुंबियांनी आसपासच्या घरांमध्ये शोधायला सुरुवात केली. मात्र ते दोघे सापडले नाहीत. यानंतर काही नातेवाईक घरामागे असलेल्या शेततळ्याकडे शोधायला गेले असता शेततळ्याजवळ मोबाईल पडलेला दिसला. दोन्ही मुले पाण्यामध्ये घसरून पडल्याचा संशय आल्याने तरुणांनी तातडीने पाण्यात उड्या टाकून शोध सुरू केला. काही वेळातच शेततळ्यात दोन्ही बालकांचे मृतदेह सापडले. तात्काळ त्यांना पाण्याबाहेर काढून तासगाव येथील रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यापैकी ऐश्वर्या ही सांगली माधवनगर येथील नातेवाईकांच्या घरातून आरवडे येथे काही दिवसांपूर्वी आली होती. तर शौर्य हा मस्के कुटूंबातील  एकुलता एक मुलगी होता, तर ऐश्वर्या हिला दोन लहान भाऊ आहेत. घटनास्थळी कुटुंबीयांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads