स्पर्धक क्रमांक ००६७ : चेतना रमेशराव इंगळे अमरावती - दैनिक शिवस्वराज्य

स्पर्धक क्रमांक ००६७ : चेतना रमेशराव इंगळे अमरावती

दैनिक शिवस्वराज्य आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धा २०२१-२०२२

मी... चेतना रमेशराव इंगळे

सहभाग घेतला असून आपण   माझा निबंध पूर्ण वाचून तसेच View व Share करून मला ही स्पर्धा जिंकण्यास शुभेच्छा व आशीर्वाद द्यावे ही विनंती...

 स्पर्धेचा निकाल हा सादरीकरणास मिळालेले views  यावर अवलंबून आहे... 

आपण वाचलेला निबंध ,आपली अनमोल कमेंट मला या स्पर्धेत यशस्वी करण्यास निश्चित सहकार्य करेल ही आशा आहे.....

स्पर्धेची बक्षिसे :-

प्रथम क्रमांक :- १०००००/- फक्त

द्वितीय क्रमांक :- ७५०००/- फक्त

तृतीय क्रमांक :- ५००००/- फक्त

चतुर्थ क्रमांक :- २५०००/- फक्त

पाचवा क्रमांक :- १५०००/- फक्त

सहा ते दहा क्रमांक :- ५०००/- प्रत्येकी

अकरा ते शंभर क्रमांक :- १०००/- प्रत्येकी

तुम्हाला या स्पर्धेत भाग घ्यायचा असल्यास खालील क्रमांकावर प्रवेश फी Google Pay किंवा Phone Pay च्या माध्यमातून पाठवा आणि या नंबरला Whatsapp ला स्क्रीनशॉट पाठवा व तुमचा प्रवेश फिक्स करा.

प्रवेश फी :- १५० रुपये फक्त

Whatsapp क्रमांक :- 8007613469

आपला नम्र

चेतना रमेशराव इंगळे


निबंधाचा विषय : छत्रपती शिवाजी महाराज

एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर....माझ्या राजाच नाव गाजतय गड किल्ल्यावर .
        शिवाजी महाराजांच्या शूर वीर कर्तबगारीचा विचार थक्क करून टाकणारा आहे. महाराजांचे अतुलनीय साहस, कुशल मुत्सद्दीपणा, स्वधर्म आणि संस्कृतीचा प्रखर अभिमान इत्यादी गुण महाजनमध्ये प्रकर्षाने जाणवत होते.
           इतिहासाच्या पानावर आणि रयतेच्या मनावर मातीच्या कणावर, विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा एकमेव राजा म्हणजे राजा शिवछत्रपती.
         छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार अतिशय प्रगत आणि प्रगल्भ होते. त्यांनी  बुरसटलेल्या व खुळचट विचारांना कधी जवळ केले नाही. शकुन अपशकुन यावर कधी विश्वास ठेवला नाही. त्यांनी अंधश्रद्धा कधी मानली नाही. ते विज्ञानवादी विचार सरणीचे होते आणि म्हणून जन्मावर आधारलेल्या जातवार श्रमविभागणीची त्यांनी मोडतोड करून समाजात अस्पृश्य कलंक मिळालेल्यांना त्यांनी स्वराजाच्या कार्यात सामाहून घेतले. महाराजांनी दलितांच्या हातातही शस्त्र देऊन स्वराज्याच्या कार्यात त्यांची मदत घेतली. म्हणूनच शिवाजी महाराजांचा हेर खात्यात प्रामुख्याने रामोशी लोक होते अनेकांच्या मते बहिर्जी नाईक हा रामोशी समाजाचा होता. यासोबत नानाजी मुशेखोरेकर, कर्माजी सारखे इतर अनेक रामोशी मंडळी महाराजांच्या हेरखात्यात प्रमुख पदावर होते. महाराजांची अनेक विश्वासू सहकारी व किल्लेदार हे महार ज्ञातीतील होते. मदारी मेहतर हा आग्र्याच्या अटकेच्या वेळी महाराजांबरोबर होता. तसेच अफजलखानाच्या भेटीच्या वेळी महाराजांनी बरोबर घेतलेल्या काही निवडक सहकार्यांपैकी जिवा महाला हा न्हावी समाजातून होता. “होता जीवा म्हणून वाचला शिवा” असा या भेटीच्या बाबतीत उल्लेख आपल्याला इतिहासात आढळतो.
          छत्तीस कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असतांना पण एकही मंदिर नसतांना जे अब्जावधींचा हृदयावर अधिराज्य करतात त्यांना छत्रपती म्हणतात.
       
      “प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।”

       विजेसारखी तलवार चालवुन गेला,
निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,
वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,
मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला!
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला असा एक
“मर्द मराठा शिवबा”होऊन गेला.”
        जगावं तर असं जगावं इतिहासातलं एक पान खास आपलं असावं.

17 Comments to

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads