स्पर्धक क्रमांक ००६४ : राहुल रानबा पाटील कोल्हापूर - दैनिक शिवस्वराज्य

स्पर्धक क्रमांक ००६४ : राहुल रानबा पाटील कोल्हापूर

दैनिक शिवस्वराज्य आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धा २०२१-२०२२

मी... राहुल रानबा पाटील

सहभाग घेतला असून आपण   माझा निबंध पूर्ण वाचून तसेच View व Share करून मला ही स्पर्धा जिंकण्यास शुभेच्छा व आशीर्वाद द्यावे ही विनंती...

 स्पर्धेचा निकाल हा सादरीकरणास मिळालेले views  यावर अवलंबून आहे... 

आपण वाचलेला निबंध ,आपली अनमोल कमेंट मला या स्पर्धेत यशस्वी करण्यास निश्चित सहकार्य करेल ही आशा आहे.....

स्पर्धेची बक्षिसे :-

प्रथम क्रमांक :- १०००००/- फक्त

द्वितीय क्रमांक :- ७५०००/- फक्त

तृतीय क्रमांक :- ५००००/- फक्त

चतुर्थ क्रमांक :- २५०००/- फक्त

पाचवा क्रमांक :- १५०००/- फक्त

सहा ते दहा क्रमांक :- ५०००/- प्रत्येकी

अकरा ते शंभर क्रमांक :- १०००/- प्रत्येकी

तुम्हाला या स्पर्धेत भाग घ्यायचा असल्यास खालील क्रमांकावर प्रवेश फी Google Pay किंवा Phone Pay च्या माध्यमातून पाठवा आणि या नंबरला Whatsapp ला स्क्रीनशॉट पाठवा व तुमचा प्रवेश फिक्स करा.

प्रवेश फी :- १५० रुपये फक्त

Whatsapp क्रमांक :- 8007613469

आपला नम्र

राहुल रानबा पाटील


निबंधाचा विषय : राष्ट्रपिता महात्मा गांधी

             राष्ट्रपिता महात्मा गांधी जी बद्दल आपल्याला सर्वांना नक्कीच माहिती आहे,पण आज मी आपल्या समोर महात्मा गांधी जी बद्दल अत्यंत महत्त्वपूर्ण आणि खरी माहिती जी खूपच कमी लोकांना  माहिती आहे ती मांडणार  आहे.
भारतीय जनतेला आंगभर कपडा माहित नाही, म्हणून ते पंजावर जगभर वावरले.गांधीजींचे मन हे स्फटीका सारखे स्वच्छ आणि पारदर्शी होते.

आचार्य विनोबा भावे यांच्या मते, " भगवान बुद्ध नंतर सत्य,अहिंसेचा एवढा मोठा पुजारी दुसरा झाला नाही."
रवींद्रनाथ टागोरांनी म्हटले," असाधूतेशी साधूत्वाने कसे झगडावे याची शिकवण देणारा हा एक महामानव होता."

आल्बर्ट आइन्स्टाईन गांधीजी बद्दल म्हणतो, हाडामाऊसाचा हा महामानव आमच्यात होता यावरती पुढील पिढ्यांचा विश्वास बसणार नाही. नेहरू म्हणतात गांधीजींनी भारताला निर्भय बनविले.

गांधीजी नी एकूण 2338 दिवस तुरुंगवास भोगला.त्यापैकी 249 दिवस ते दक्षिण आफ्रिका मधे तुरुंगात होते.
गांधीजी वरती आतापर्यंत 90,000 पुस्तके लिहिली गेली आहेत.
पाकिस्तान इराण ब्रिटनसह 100 पेक्षा अधिक देशांत गांधीजी चे पुतळे आहेत
150 देशातील 800 पोस्टाच्या तिकिटावर गांधीजी चे चित्र आहे.
गांधीजी त्यांच्या जन्म शताब्दी वर्षात 1969 मधे चलनी नोटांवर प्रथम दिसले.
गांधीजी वरती 45 चित्रपट व 500 डॉक्युमेंट्री तयार करण्यात आल्या.
mkgandhi.org ही साईट रोज 200 देशातील 8000 लोक पाहतात.
भारतातील 719 जिल्ह्यात गांधीजींच्या नावाने रस्ते शाळा व उद्याने आहेत.
19 व्यां वयापर्यंत ते मोहन म्हणून ओळखले जात.
50 व्या  वर्षी रवींद्रनाथ टागोरांनी त्यांचा उलेख महात्मा म्हणून केला.
गांधीजी जेंव्हा 74 वर्षांचे होते तेंव्हा नेताजी बोस यांनी रेडिओ संदेशात गांधीजींना राष्ट्रपिता म्हटले.

पण आपल्या देशाचं आणि आपल दुर्दैव म्हणाव लागेल,
सगळ जग ज्यांचां गौरव करत गुणगान गाते त्या राष्ट्र पुरुषांना बदनाम करणारे लोक आपल्याला    आपल्या आजूबाजूला अगदी सहज पाहायला मिळतात.सगळ्यात दुःखाची गोष्ट म्हणजे गांधीजी ना नावे ठेवणारे लोक तुम्हाला फक्त भारतातच पाहायला मिळतील,सगळ जग ज्यांच्या विचारांचा सन्मान आदर करत,त्या थोर राष्ट्र पुरुषांची विटंबना करणारे मूर्ख लोक आपल्या देशात खूप आहेत.ही आजची सत्य परिस्थिती आहे. व्हॉट्स ॲप वरती आला मेसेज की केला फॉरवर्ड.तो message खरा आहे का, खरा इतिहास काय आहे हे मात्र कोण जाणून घेणार नाही.त्यांना माझी एकच विनंती आहे, त्यांनी आधी खरा इतिहास जाणून घ्यावा.
काही लोक गांधींनी त्या वेळी स्वीकारलेल्या मार्गाची म्हणजेच अहिंसेचा मार्ग त्याची खिल्ली उडवत असतात,त्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी, की त्या वेळी इंग्रजांच्या विरोधात शस्त्र उचलून इंग्रजांना हरवणे अशक्य होते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी हा प्रयत्न केला होता.पण काय झालं आपल्याला माहीत आहे.आजुन लाखो निरपराध लोकांना जीव गेला असता. छत्रपती शिवाजी महाराज महात्मा गांधी यांच्या सारखे युगपुरुष आपल्या देशात जन्माला आले, हे आपल भाग्य म्हटल पाहिजे...

आजुन काही लोक म्हणतात गांधीजीं आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मधे मतभेद होते पण त्यांनी हे लक्षात ठेवावं त्यांच्या मधे फक्त वैचारिक मतभेद होते, बाकी नेताजी गांधी ना आपल्या मुलासारखे होते. जेंव्हा त्यांना समजल 
नेताजींचा विमान अपघातात मृत्यू झाला तेंव्हा त्यांच्या तोंडून पाहिलं वाक्य बाहेर पडल, " माझा मुलगा गेला!"

काही मूर्ख लोक तर नथुराम गोडसे ह्या माथेफिरू ला देशभक्त म्हणतात.अमेरिकेच्या टाईम मासिकाने गेल्या शतकातील म्हणजेच 1900 ते 1999 ह्या 100 वर्षातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली त्यामधे
महात्मा गांधी ह्या एकमेव भारतीयाच नाव आहे.

अस्पृश्य समाज ही आज गांधीजींना नावे ठेवतो, ते अगदी सहज बोलून जातात त्यांनी आमच्या साठी काय केलं.पण त्यांनी आपल्या देशासाठी काय केलं हे त्यांना दिसत नाही.
त्यांनी राखीव मतदार संघ चां हट्ट धरला म्हणून आज ते समाजाच्या मुख्य प्रवाहात आहेत, आंबेडकर chay मागणीनुसार स्वतंत्र मतदार संघ दिले असते तर ते समाजाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर फेकले गेले असते.

जेंव्हा भारत स्वतंत्र झाला,संपूर्ण देश स्वतंत्रतेचां आनंद साजरा करत होता तेंव्हा गांधीजी नौखाली येथे होते.
हिंदू-मुस्लिम दंगली थांबवण्याचा जिवाच्या आकांताने आपल्या जीवाची पर्वा न करता प्रयत्न करत होते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन देशासाठी समर्पित केलं होत.
इंग्रज फक्त एकच व्यक्तीला भित होते ,आणि ते व्यक्ती होते महात्मा गांधी...
बाबा आमटे यांनी " गांधीजी :एक युगमुद्रा " या लेखात म्हटले आहे, गांधीजींचे माहात्म्य सांगून गांधी सांगता येणार नाहीत.उद्याच्या पिढ्यांना त्यांची ओळख पटविण्यासाठी कदाचित कॉम्प्युटर लागेल;पण काळाच्या भाळावर उमटलेली ही तप्त युगमुद्रा कोणत्याही इतिहासाला पुसून काढता येणार नाही. 
इतिहासात कोणतीही व्यक्ती उगाचच एवढी मोठी होत नाही, तर त्या माघे त्या व्यक्तीचं कर्तुत्व असत, उगाचच कोणी राष्ट्रपिता होत नाही.आणि हो प्रत्येक देशात राष्ट्रपिता हा एकच असतो.आणि  आपल्या देशाचे राष्ट्रपिता आहेत महात्मा गांधी.......

23 Comments to

  1. खुपचं छान माहिती सांगितली आहेस तू तुझ्या निबंधातून

    उत्तर द्याहटवा
  2. खूप चांगली माहिती लिहिली आहे तुम्ही रोहन

    उत्तर द्याहटवा
  3. आज तुमचा हा लेख वाचून 100 वर्षांपूर्वीचा इतिहास नव्याने जागा झाला असेच लेख तयार करून तुमच्या नावाचे एक पुस्तक प्रकाशित करू🙏

    उत्तर द्याहटवा
  4. खूपच सुंदर लिखाण केले आहे राहुल

    उत्तर द्याहटवा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads