महाराष्ट्र
अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यापाऱ्यांनी घेतली योगेश कदमांची भेट
राकेश कोळी उपसंपादक :-
कोरोनामुळे गेल्या दीड दोन वर्षांत अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यापाऱ्यांना प्रशासनाने जणू काही वेठीस धरले होते. हा त्रास संपुर्ण महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांना होत होता. आता सरसकट सर्व दुकाने उघडण्यासाठी परवानगी मिळावी व पोलीसांकडून त्रास होऊ नये यासाठी खेड मधील व्यापाऱ्यांनी आमदार योगेश कदम यांची भेट घेतली.
यावर्षी आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी होत असताना रत्नागिरी जिल्ह्यातील निर्बंध जसेच्या तसे ठेवण्यात आले होते. मात्र जिल्ह्यातील खेड तालुका वगळता इतर तालुक्यात मात्र छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचे व्यवहार हे सुरळीतपणे चालू झाल्याचे निदर्शनास आले होते. मात्र खेडमधील अत्यावश्यक सेवेतील व्यापारी वगळता इतर व्यापाऱ्यांनी दापोली मतदारसंघाचे आमदार योगेशदादा कदम यांची भेट घेतली व आपल्या व्यथा मांडल्या. यावेळी व्यथा मांडत असताना व्यापाऱ्यांकडून पोलीस प्रशासनावर आरोप करण्यात आले. ते म्हणजे पोलीस प्रशासन व्यापाऱ्यांवरती नाहकपणे दुकान बंद करण्यासाठी सक्ती करते. सुमारे ४ वाजेपर्यंत दुकाने चालू ठेवण्यास परवानगी असताना देखील दुपारपासूनच दुकान बंद करण्यासाठी पोलीसांकडून दबाव आणला जात होता. काही व्यापाऱ्यांवरती तर फौजदारी गुन्हे देखील दाखल झाले आहेत. ही बाब देखील व्यापाऱ्यांनी निदर्शनास आणून दिली आहे. या सर्व बाबींची दखल घेत आमदार योगेश कदम यांनी तात्काळ उपविभागीय अधिकारी श्री. शशिकीरण काशीद यांना व्यापाऱ्यांच्या समवेत चालू असलेल्या बैठकीत बोलावून घेतले. तसेच प्रशासनाकडून जी काही कारवाई चालू आहे, ती तात्काळ थांबवावी अशा सूचना केल्या. व्यापारी वर्गाने जसे आजपर्यंत सहकार्य केले तसे या पुढेही करतील व पूर्ण जबाबदारीने ते व्यवसाय करतील अशी ग्वाही दिली. पोलीस प्रशासना मार्फत उपविभागीय अधिकारी श्री. शशिकीरण काशीद यांनीसुद्धा सकारात्मक प्रतिसाद दर्शवून उद्यापासून व्यापाऱ्यांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली जाईल असे मत यावेळी व्यक्त केले.
पोलीसांना दोष कशाला?
कोरोनाच्या दुसर्या लाटेचा जोर आता काहीसा ओसरला असला तरी धोका पुर्णपणे टळला नाही. प्रशासनाकडून नियमात शिथीलता देण्यात आली असली तरी जनतेच्या हितासाठीच प्रशासनाकडून नियमावली बनवण्यात आली होती. आता सरसकट व्यापाऱ्यांना परवानगी दिल्यास बाजारात होणाऱ्या गर्दीला कोण आवरणार? या गर्दीमुळे कोरोनाचा उद्रेक झाला तर जबाबदार कोण? शांतता व सुव्यवस्था राखत असताना प्रशासनाकडून आलेल्या नियमांची अंमल बजावणी केली तर पोलिसांना दोष कशाला. गेल्या दोन महिन्यांत कडक लाॅकडाउन असताना देखील घरातून, पाठीमागील दारातून धंदा करणाऱ्यांना प्रशासनाने केलेल्या सहकार्याचा बहुदा विसर पडलेला दिसत आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा