महाराष्ट्र
जिल्हा काँग्रेसचे मोठे नुकसान- जमीर माखजणकर
राकेश कोळी उपसंपादक :-
रत्नागिरी जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष कै. मा. ॲड, विजयराव भोसले, यांचे नुकतेच निधन झाले. त्यानिमित्ताने आज खेड नगर परिषद हाॅलमध्ये शोकसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना त्यांनी विजयराव भोसले यांच्या जाण्याने पक्षाचे मोठे नुकसान झाल्याचे मत जिल्हा सचिव जमीर माखजणकर यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, विजयराव भोसले म्हणजे कार्यकर्त्यांची जाण असणारा नेता, नवीन तरुणांना संधी देणारा व कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेवून कार्यकर्त्यांच्या कामाला न्याय देणारा नेता असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी अभ्यासू व काँग्रेसचा निष्ठावंत शिपाई हा आज काँग्रेस पक्षातून निघून गेल्याने फार मोठी दुःखद व वाईट घटना घडल्याचे ही सांगितले. अनेक वर्षां नंतर मिळालेल एक चांगलं आणि उत्तम नेतृत्व, की ज्यांनी जिल्ह्यात रसातळाला गेलेल्या काँग्रेसला मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न केले होते. जसे एखाद्ये जहाज धावपट्टीवर येते आणि धावता धावता उड्डाण करण्याआधी त्याला अपघात होतो. आशाच प्रकारे काँग्रेसच्या या जहाजाला धावपट्टी वरुन उड्डाण घेण्याअगोदर अपघात झाला, असेच म्हणावे लागेल. काँग्रेस पक्षामध्ये निर्माण झालेली ही पोकळी कधीही भरून न निघणारी असल्याचे मत ही त्यांनी यावेळी व्यक्त करत त्यांनी श्रध्दांजली वाहिली.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा