स्पर्धक क्रमांक ००७ : श्रुती सीताराम नरतवडेकर कोल्हापूर - दैनिक शिवस्वराज्य

स्पर्धक क्रमांक ००७ : श्रुती सीताराम नरतवडेकर कोल्हापूर

दैनिक शिवस्वराज्य आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धा २०२१-२०२२

मी... श्रुती सीताराम नरतवडेकर

सहभाग घेतला असून आपण   माझा निबंध पूर्ण वाचून तसेच View व Share करून मला ही स्पर्धा जिंकण्यास शुभेच्छा व आशीर्वाद द्यावे ही विनंती...

 स्पर्धेचा निकाल हा सादरीकरणास मिळालेले views  यावर अवलंबून आहे... 

आपण वाचलेला निबंध ,आपली अनमोल कमेंट मला या स्पर्धेत यशस्वी करण्यास निश्चित सहकार्य करेल ही आशा आहे.....

स्पर्धेची बक्षिसे :-

प्रथम क्रमांक :- १०००००/- फक्त

द्वितीय क्रमांक :- ७५०००/- फक्त

तृतीय क्रमांक :- ५००००/- फक्त

चतुर्थ क्रमांक :- २५०००/- फक्त

पाचवा क्रमांक :- १५०००/- फक्त

सहा ते दहा क्रमांक :- ५०००/- प्रत्येकी

अकरा ते शंभर क्रमांक :- १०००/- प्रत्येकी


तुम्हाला या स्पर्धेत भाग घ्यायचा असल्यास खालील क्रमांकावर प्रवेश फी Google Pay किंवा Phone Pay च्या माध्यमातून पाठवा आणि या नंबरला Whatsapp ला स्क्रीनशॉट पाठवा व तुमचा प्रवेश फिक्स करा.

प्रवेश फी :- १५० रुपये फक्त

Whatsapp क्रमांक :- 8007613469

आपला नम्र

श्रुती सीताराम नरतवडेकर


निबंधाचा विषय : राष्ट्रपीता महात्मा गांधी

      भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार असे महात्मा गांधी यांना म्हणता येईल . म्हणून त्याना राष्ट्रपिता असा दर्जा दिला आहे. आपल्या अहिंसात्मक आंदोलनाच्या माध्यमातून या देशाला स्वांतत्र्य मिळवून देणाऱ्या महात्माजीचा जन्म दोन ऑक्टोंबर १८६९ रोजी गुजरात मधील पोरबंदर येथे झाला.
         १८८८ मध्ये ते कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी इंग्लडला गेले. तेथे त्यांनी बॅरीस्टर ही पदवी मिळवली . १८९१ मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी वकिलीला सुरवात केली. पण आयुष्यात एक वळण अचानक असे आले की ते दक्षिण आफ्रिकेत गेले. तेथे जाऊन वकिली करू लागले. तेथेही ते योगायोगानेच तेथील भारतीयांच्या अधिकाराच्या आंदोलनात ओढले गेले. पुढे या आंदोलनाचे नेतृत्व करून त्यांनी अहिंसात्मक आंदोलनाद्वारे आपले हक्क मिळवण्याचा अभिनव प्रयोग यशस्वी करून दाखवला. सत्याग्रहाचा प्रयोग ही त्यांनी तेथेच केला. तेथेच त्यांनी १९०३ मध्ये इंडियन ओपिनिय नावाचे वृत्तपत्र काढले. सत्याग्रह शिबिराची स्थापनाही त्यांनी तेथे केली
       १९१४ मध्ये ते भारतात परतले. १९१५ पासून  ते महात्मा म्हणून विख्यात आले. १९१७ मध्ये त्यांनी चंपारण येथील शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आंदोलन केले. पुढे 
१९२० - २२ मध्ये अहिंसक असहकार आंदोलन , १९३०-३२ दरम्यान दांडी येथील मीठाचा सत्याग्रह आणि सविनय कायदेभंग, १९४० - ४२ दरम्यान व्यक्तिगत सत्याग्रह आणि १९४२ चे भारत छोडो आंदोलन या साऱ्यात महात्माजींचे नेतृत्व झळकावून उठले.
मोहनदास महात्मा होऊन 
या जगात झाले अमर 
देशाच्या अस्तिवासाठी 
लढले स्वातंत्र्य समर...
     महात्मा गांधी केवळ अट्टल राजकारणीच नव्हते तर जीवनाच्या विविध पैलूवर त्यांचा चांगलाच प्रभाव होता. ते चांगले समाजसुधारक , कुशल अर्थज्ज्ञ 
होतेच याबरोबरच त्यांचा उत्कृष्ट जनसंर्पक होता. ज्यावेळी मुद्रण माध्यम इंग्रजांच्या आधिपत्याखाली होते, अशा वेळी गांधीजींना आपल्या विचारांची लाट गावागावात आणि शहराशहरात पोहचवली. त्यांच्या सरळ, साध्या व सोप्या भाषेचा प्रभाव लाखो लोंकावर पडत असे.
       इंडियन ओपिनियन मध्ये गांधीजींनी लिहले आहे...
व्यकतीचा प्रमुख संघर्ष आतून असतो. ती आतील शकती प्रेरणा देत  
असते. हे कार्य वर्तमानपत्र चांगल्या प्रकारे करू शकतात. एका पत्रकाराच्या रुपाने त्यांनी सामाजिक, आर्थिक व राजकीय विचार मांडले, त्यामुळे तत्कालीन बुद्धिमंत वर्गाने म्हणजे वकील, शिक्षक, पत्रकार ट्रेड युनियनचे नेते आदींनी गांधीजीना आपले प्रेरणास्थान मानले.
      त्यांनी सुरु केलेल्या हरिजन वृत्तपत्राचा उद्देशच ग्रामीण भागातील लोंकाचे भले करणे आणि त्यांच्या जीवनामध्ये सुधारणा करणे होता. सामाजिक सुधारणा, शिक्षणपर लेखांच्या शिवाय गांधीजींच्या वर्तमान पत्रात आगामी राजकीय कार्यक्रम, रणनीती यांचेही विवरण असायचे.
नेसून सुती पंचा
हातात घेतली काठी 
अन्याय मिटवण्यासाठी
लागेल अहिंसेच्या पाठी...
      प्रख्यात शास्त्रज्ञ आईनस्टाईनने गांधीजींच्या बाबतीत एकदा म्हणटले होते, असा कुणी माणूस या धरतीवर निर्माण झाला होता. यावर येणारी पिढी क्वचितच विश्वास ठेवेल.
गांधींनी लिहिलेले पुस्तके व त्यांच्यावर लिहिलेली पुस्तके : -
१ : गांधीजीनी लिहलेली पुस्तके
Indian Home Rule (हिंद स्वराज्य )
गांधी विचार दर्शन : अहिंसाविचार
गांधी विचार दर्शन : राजकारण
गांधी विचार दर्शन : सत्याग्रह प्रयोग
गांधी विचार दर्शन : सत्याग्रह विचार
गांधी विचार दर्शन : सत्याग्रहाची जन्मकथा
गांधी विचार दर्शन : हरिजन
नैतिक धर्म 
माझ्या स्वप्नांचा भारत 

गांधींवरील लिहलेली पुस्तके
अखंड प्रेरणा गांधी विचारांची ( डॉ . रघुनाथ माशेलकर )

अस्त गांधीयुगाचा आणि नंतर (अनंत ओगले )
मराठीमध्ये पु . ल . देशपांडे आणि अवंतिकाबाई गोखले यांनी गांधीजींचे   
चरित्र लिहले आहे.
          
         गांधीजींचे पुर्ण लेखन भारत सरकारने संकलित महात्मा गांधी या नावाखाली १९६० च्या दशकात प्रकाशित केले आहे. यामध्ये जवळपास १०० खंड व त्यांची ५०००० पृष्ठसंख्या आहेत.
 
शांतीदूत तुम्ही देशाचे
शांततेची केली कामना
सत्य, अहिंसेचा संदेश
जागवली स्वातंत्र्य भावना...
       महात्मा गांधींचे धर्मावर विचार :
१ : - या प्रकारे जगावे आणि उद्या मरणार आहात आणि या प्रकारे शिकावे की तुम्ही नेहमीसाठी शिकणार आहात.

२ :- परमात्म्याचा कोणताही धर्म नाही.

३ :- मी दुसर्‍यांच्या वेदना समज णाऱ्याला धार्मिक समजतो.

४ः- काय धर्म इतकं सरक आहे जसे कपडे, ज्याला एखादा मनुष्य आपल्या इच्छेनुसार घालू किंवा बदलू  
शकतो?
धर्मासाठी लोकं पूर्ण आयुष्य जगतात.
 
५ :- माझं धर्म सत्य आणि आ हिंसावर आधारित आहे. सत्य माझा देव आहे आणि अहिंसा ते साकारण्याचं साधन.

६ : - धर्म जीवनाच्या तुलनेत अधिक आहे. लक्षात असावे की दार्शनिक मान्यतेच्या प्रमाणात मनुष्य किती ही निम्न स्तरावर असला तरी त्याचं आपलं धर्मच परन सत्य आहे.

७:- धर्माचे राजकारणाशी कुठलाही संबंध नाही असे म्हणणार्यांना धर्म काय हे माहीतच नाही.

८ :- सर्व तत्वांना सर्व धर्मांच्या या तार्किक युगात तर्काच्या अग्निपरीक क्षेतून जावे लागेल आणि सार्वत्रिक मान्यता प्राप्त करावी लागेल.

९ :- कुणाचाही धर्म शेवटी त्याच्या आणि त्याच्या निर्मात्याच्या मधील संबद्ध आहे इतर कोणाच्याही नाही.

१० : - व्यावहारिक गोष्टींवर लक्ष न देणार व समाधान शोधण्यात मदत न करणारा धर्म नाही 

खेउयांकडे चला हा मूलमंत्र
स्वच्छतेचा दिला संदेश
इंग्रज सत्तेला झुगारून
दिला चले जाव चा आदेश ...

व्यक्ती स्वच्छ नाही तर स्वस्थ नाही : महात्मा गांधींचे विचार
१ :- राजकीय स्वातंत्र्यापेक्षा स्वच्छतेचे महत्व अधिक आहे.

२ :- व्यक्ती स्वच्छ नाही तर स्वच्छ नाही 

३ः - साफ - सफाईने भारताचे गाव आदर्श बनू शकतात.

४:- शौचालय आपल्या बैठक कक्षा प्रमाणे स्वच्छ ठेवले पाहिजे .

५: - नद्या स्वच्छ ठेवून आपण आपल्या सभ्यता जिंवत राखू शकतो.

६ः - आंतरिक स्वच्छता पहिली वस्तू आहे जी शिकवता नाही. यानंतर इतर 
गोष्टींकडे लक्ष द्यावे .

७:- प्रत्येकाने आपला कचरा स्वतः स्वच्छ करायला हवा.

८:- मी कोणालाही घाणेरड्या पायाने आपल्या मनात प्रवेश देणार नाही.

९:- आपली चूक स्वीकारणे झाडू ला वण्यासारखे आहे ज्याने जागा स्वच्छ आणि चमकदार होते.

१०:- स्वच्छता आपल्या आचरणात या प्रकारे सामील करा की त्यांची सवय होईल .

        ९ ऑगस्ट १९४२ ला त्यांनी मुंबईत करा किंवा मरा असे आवाहन 
जनतेला केले. त्यानंतर त्यांना अटक झाली. त्यांना पुण्यात आगाखान पॅलेस येथे ठेवण्यात आले. तेथे ६ मे १९४४ ला त्यांना सोडण्यात आले. त्यांनी अनेकदा उपोषणाचा मार्ग अवलंबून ब्रिटीश सरकारला जेरीला आणले. त्यांच्या प्रयत्नांना  यश येऊन अखेर १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले.

नमन स्वीकारा आमचे
बापू तुम्ही महात्मा
भारताच्या प्रगतीसाठी
तुमचा अमर आत्मा...

      लोंकासाठी आयुष्याचा होम करणाऱ्या थोर नेत्याचा एका असंतुष्टाने ३० जानेवारी १९४८ मध्ये गोळी घालून हत्या केली. त्यातच त्यांचे निधन झाले.

      क्षणोक्षणी पेटवू रक्त रक्त आठवू,
       महात्मा गांधींजींचे नाव आपल्या 
        हृदयात साठवू ।
धन्यवाद

32 Comments to

  1. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. निबंध छान लिहिलेला आहे ।। उत्कृष्ट ✌️✌️🙏🔥🔥💥💐💥💐🔥

    उत्तर द्याहटवा
  3. उत्कृष्ट प्रकारे विचार मांडले आहेत 👍🏻

    उत्तर द्याहटवा
  4. अतिशय सुंदर निबंध. व त्यातील विचार छान.

    उत्तर द्याहटवा
  5. खूपच छान
    अतिशय सुंदर
    All the Best 👍👍

    उत्तर द्याहटवा
  6. निबंधाची मांडणी छान केली आहे. सुंदर !!

    उत्तर द्याहटवा
  7. छान !! सुंदर लिहला आहे निबंध

    उत्तर द्याहटवा
  8. श्रुतीने निबंधात केलेली वैचारिक मांडणी अगदी योग्य आहे त्यामुळे तिने लिहिलेले निबंध मला खुपच छान वाटतो

    उत्तर द्याहटवा
  9. खुप चांगल्या रीतीने निबंध लेखन केले आहे

    उत्तर द्याहटवा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads