महाराष्ट्र
कामती बु. येथे वैज्ञानिकरित्या फळबागांची लागवड कशी करायची याचे कृषी कन्यांकडुन प्रात्यक्षिक....
समीर शेख प्रतीनिधी
सोलापूर (कामती) : भारत आधुनिक होत असताना शेती देखील पारंपारिक पद्धतीने न राहता तिचा कल वैज्ञानिकदृष्टी कडे जात आहे. फळबागांची लागवड वैज्ञानिकरित्या होणे गरजेचे आहे. हीच बाब लक्षात घेऊन लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा येथे चतुर्थ वर्षामध्ये शिकत असणाऱ्या कृषी कन्यानी कामती बु. या गावांमध्ये वैज्ञानिकरित्या फळबागांची लागवड कशी करायची याचे प्रात्यक्षिक दिले.
सर्वसामान्यपणे सर्व शेतकरी वर्ग फळबागांची लागवड करताना वैज्ञानिक पद्धतीचाच वापर करतील असे नाही. म्हणून कृषीकन्यानी आंबा या फळझाडाची वैज्ञानिक दृष्ट्या लागवड तसेच शेणखत, रासायनिक खतांची मात्रा याबद्दलची माहिती सांगण्यात आली.
यावेळी कृषीकन्या पूजा गायकवाड, राजनंदिनी दुबल, सोनाली कोंडार, अश्विनी गणगे ,गौरी लोकरे, सृष्टी भरमण्णवर , अंकिता अद्दुलामले ,निशा लोंढे तसेच या प्रात्यक्षिकाला बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला. यासाठी विद्यार्थींना लोकमंगल कृषी महाविद्यालय, वडाळा उत्तर सोलापूर येथील प्राचार्य अमोल शिंदे, प्रा. नवनाथ गोसावी, कार्यक्रम आधिकारी डॉ. प्रा. संतोष शेंडे, विषयतज्ञ प्रा. गणेश भोसले यांनी मार्गदर्शन केले.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा